शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

Rajya Sabha Election 2022: “राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार, भाजपने पैसा फुकट घालवू नये”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 12:09 PM

Rajya Sabha Election 2022: भाजपचे चारित्र्य उघड होत असून, कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशीही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून, याचा नेमक्या कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कुणाला धक्का बसतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले असून, राज्यसभेच्या सर्व ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असून, भाजपने आपला पैसा फुकट घालवू नये. तो सत्कार्यात लावावा, असा खोचक टोला लगावला आहे. 

भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार दिल्यापासून संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांनी भाजपला घोडेबाजार करायचा आहे, असा आरोप करण्यास सुरुवात केली. मात्र, भाजप कोणताही घोडेबाजार करणार नाही. महाविकास आघाडीला घोडेबाजाराची भीती वाटत असेल, तर त्यांनी एक उमेदवार मागे घ्यावा, असे प्रतिआव्हान भाजपने दिले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणीच माघार न घेतल्यामुळे आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. 

अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही. महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर आहे. आम्ही पण ताकदीने सत्तेवर उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. भाजप अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. ते त्यांना आमिष आणि प्रलोभन दाखवणार. त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे आणला जातोय? याची माहिती आमच्याकडे रोज येतेय. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातायेत ते आमचेही मित्र आहे. ईडी आणि जुनी प्रकरणे आणि केंद्राच्या अखत्यारीत येणारी प्रकरणे उकरुन काढत त्रास दिला जात आहे. यात भाजपचे चारित्र्य उघड होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार

राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार. भाजपने उगाच आपले पैसे वाया घालवू नये. एखाद्या सामाजिक कार्यात वापरावे. सवय आणि चटक लावू नये. बाकी आम्ही समर्थ आहोत. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा आम्हाला चांगला अनुभव आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही. पण बाकी इतर बऱ्याच गोष्टी सरकार म्हणून आमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला. 

कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजय मिळवून राज्यसभेत जातील. आम्ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राचे वातावरण खराब करायचे आहे. आम्ही सत्तेवर आहोत, हे तुम्ही विसरू नका. कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल. बहुजन विकास आघाडी कुठे आहे? एमआयएम कुठे आहे? बच्चू कडू आणि आमदार कुठे आहे? हे १० तारखेलाच कळेल, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, विधानसभेत लहान पक्षांचे १६, तर अपक्ष १३ आमदार आहेत. ते कोणासोबत जातील यावर निकाल अवलंबून असेल. बहुजन विकास आघाडी ३, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २, मनसे १, रासप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, जनसुराज्य पार्टी १, शेतकरी कामगार पक्ष १ आणि कम्युनिस्ट पक्ष १ असे लहान पक्षांचे संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत:चे दोन, तर शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे, पण तिसऱ्या व दुसऱ्या जागेसाठी  इतरांची मदत लागेल. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा