शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकटे आम्हीच लढतोय! राष्ट्रवादीच्या 'सॉफ्ट' भूमिकेवर शिवसेना नाराज; मुख्यमंत्री थेट पवारांशी बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:45 IST

राष्ट्रवादीनं केव्हा केव्हा नरमाईची भूमिका घेतली?; शिवसेना नेत्यानं यादीच वाचली

मुंबई: महाविकास आघाडीमधील कुरबुरी कायम आहेत. एका बाजूला काँग्रेसचे २५ आमदार नाराज असताना आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर समाधानी नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेना अतिशय आक्रमकपणे अंगावर घेत असताना राष्ट्रवादीनं नरमाईची भूमिका घेतल्यानं शिवसेनेत नाराजी आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे बोलून दाखवल्याचं वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यावरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रवादीनं मात्र नरमाईची भूमिका घेतल्याचं शिवसेना नेत्यांना वाटतं. राष्ट्रवादीनं भाजपविरोधात कधी कधी 'सॉफ्ट' भूमिका घेतली, त्याची उदाहरणंच शिवसेनेतील सुत्रांनी दिली आहेत.

- १३ मार्चला मुंबई पोलिसांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीतील मुंबई पोलिसांच्या सायबर विंगमध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्यानंतर गृह मंत्रालयानं अचानक निर्णय बदलला. पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या निवासस्थानी गेले. शिवसेना नेत्यांना ही बाब खटकली. गृह मंत्रालय ज्याप्रकारे पोलीस दल हाताळत आहे, त्याबद्दल शिवसेना समाधानी नाही. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे.

- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर तोफ डागू लागले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं विधान शिवसेनेला रुचलेलं नाही. 'दोन्ही बाजूंनी शांत व्हावं आणि परिस्थिती हाताबाहेर जायला देऊ नये,' असं पवार म्हणाले होते. शिवसेनेला अजित पवारांकडून आक्रमक पवित्रा अपेक्षित होता. मात्र तसं झालं नाही.

- गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं. तालिका अध्यक्षांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यावर अजित पवारांनी घेतलेली भूमिका शिवसेनेला पटली नाही. आमदारांना काही तास किंवा दिवसांसाठी निलंबित केलं जाऊ शकतं. पण १२ महिन्यांचा कालावधी जास्त असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं.

- २८ मार्चला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. 'मोदींना लोकांनी कौल दिला आहे. त्यांच्यात काही तरी चांगले गुणे असावेत किंवा ते चांगली कामं करत असावेत. मात्र ती विरोधकांना शोधता येत नसावीत,' असं मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

लढाई आम्हीच लढतोय, राष्ट्रवादी बॅकफूटवर'भाजपविरोधातील लढाई आम्हीच लढत आहोत. शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक फ्रंटफूटवर आहेत. पण राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीनं ज्याप्रकारे भाजपशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही,' असं शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यानं एक्स्प्रेसला सांगितलं.

भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्यानं मविआच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात असताना पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित काम होताना दिसत नसल्याचं शिवसेनेतील सुत्रांनी सांगितलं. तर आम्ही भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पण शिवसेनेच्या काही नेत्यांना राष्ट्रवादीनं आणखी आक्रमक व्हावं असं वाटतं. कारण गृह मंत्रालय आमच्याकडे आहे, असं राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीशरद पवारांना सांगितलं आहे. मविआनं आक्रमकपणे भाजपचा सामना करावा असं खुद्द शरद पवारांचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील, अशी आशा सेना नेत्यानं व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा