शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:31 IST

Shiv Sena Shinde Group News: प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group News: एका बाजूला विरोधक महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका करत असून, दुसरीकडे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा अद्याप संपलेला दिसत नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर येणार असून, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहे. अमित शाह यांच्या भेटीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. 

रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले पहिल्यापासून शक्तिप्रदर्शन करत आक्रमक भूमिका घेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे हेही अदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे, म्हणून आग्रही आहेत. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा इशारा दिला आहे. 

गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह

आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. तसेच अमित शाह हे खासदार तटकरे यांच्याकडे भोजनाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. मात्र, बंद दाराआड चर्चा करण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. कारण आम्ही सर्वच रायगडवासीय आशावादी आहोत की भरत गोगावले यांच्या रुपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल. आम्ही सर्वजण आशावादी आहोत की, आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. पण जर असे घडले नाही तर रायगडची परंपरा आहे की, रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा रायगडमधून उठाव होतो आणि मग परिवर्तन होते. हे देशाने आणि राज्याने पाहिले आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खरे तर खूप उशीर झाला आहे. मागच्या परिवर्तनात रायगडचा इतिहास हा सर्वांना ज्ञात आहे. तेव्हा भरत गोगावले हे कदाचित मंत्री झाले असते तर ते पालकमंत्री नक्कीच झाले असते. कारण भरत गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत. प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो. सुनील तटकरे यांचा हव्यास असला तरी रायगडची जनता हे स्वीकारणार नाही, असेही दळवी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :RaigadरायगडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेAditi Tatkareअदिती तटकरे