शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: "मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही..."; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 2:07 PM

रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद; पक्षनेतृत्वाला विचारले सवाल

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सुरूवातील राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ( BJP ) महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ५०पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. शिंदे गटावर सातत्याने टीका होत असताना कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेते रामदाम कदम यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदान जवळच आहे, असा एका अर्थाने इशाराच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. ( Maharashtra Political Crisis )

रामदाम कदम यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, अनिल परब, संजय राऊत यांसारखे नेतेमंडळी विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे आहेत असं शिंदे गटातील अनेक लोक बोलत आहेत. तुमच्या मते ते बडवे खरंच कोण आहेत, आणि त्यांच्या वर्तणुकीमुळे खरंच शिवसेनेला फटका बसला आहे का? या प्रश्नाचं एबीपीमाझाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, "मला आज नावं घ्यायला लावू नका. कारण नावं सगळ्यांना माहिती आहेत. नावं तुम्हीच घेतली आहेत पण तुम्हाला माझ्या तोंडून वदवून घ्यायचं आहे. पण मी तेवढा कच्चा खिलाडी नाही. योग्य वेळ आली की नक्कीच ती नावं पण घेईन. घोडं मैदान लांब नाही. मी काही गोष्टी आज पहिल्यांदाच लोकांसमोर बोललो आहे. त्यामुळे रामदास कदमला उगाच बोलवलं असा पश्चात्ताप तुम्हाला होणार नाही."

"पक्षाने नवं नेतृत्वाला संधी द्यायला हवी असं माझंही मत आहे. पण मग सुभाष देसाईंना सातत्याने संधी का? मनिषा कायंदे, प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं होतं? जे लोक ५२ वर्ष काम करत आहेत, त्यांना तुम्ही दूर लोटता. आणि सुभाष देसाईंनी जेव्हा महाविकास आघाडी सरकारमधून शपथ घेतली त्यावेळी संपूर्ण मैदानात शांतता होती. कोणालाही जल्लोष करावासा वाटला नाही. तेच एकनाथ शिंदेंनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा मात्र त्यांचा, बाळासाहेबांच्या नावाचा आणि शिवसेनेचा जयघोष सुरू होता", असाही रोखठोक मुद्दा रामदास कदमांनी मांडला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRamdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत