शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ; ठाकरे गटाच्या नेत्याचे ‘त्या’ तीन पक्षांकडे बोट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 2:03 PM

Maharashtra News: छत्रपती संभाजीनगरधील घटनेवरून ठाकरे गटातील नेत्याने मोठा आरोप केला आहे.

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात असलेल्या राम मंदिराच्या परिसरात मध्यरात्री काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचे पर्यावसान दगडफेकीत झाले. यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. 

शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण परिसरात आपण शांतता ठेवली पाहिजे. पण हे का घडले? हा प्रकार घडवणारे लोक कोण आहेत? याकडे लक्ष दिले पाहिजे. गेल्या महिनाभरापासून आम्ही सातत्याने म्हणत आहोत की, या शहरातील वातावरण खराब करून लोकांच्या मनात विष कालवले जात आहे. एमआयएमसारखी संघटना १० ते १५ दिवस आंदोलन करते. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत आंदोलने सुरू असतात. पोलीस काहीच दखल घेत नाहीत. कोणावरही कारवाई करत नाहीत. पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत. संरक्षण करणाऱ्यांवर हात उचलले जातात, ते हात पोलिसांनी तोडून टाकले पाहिजेत. या गोंधळामागे एआयएमआयएम आणि राज्य सरकारमधले दोन पक्ष आहेत, असा मोठा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

जनाधार मिळवण्यासाठी हे सगळे सुरू आहे

मी महिनाभरापासून सांगतोय की, संभाजीनगरात अशांतता पसरवली जात आहे. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. जनाधार मिळवण्यासाठी हे सगळे सुरू आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही सरकारवर आरोप केले.

दरम्यान, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना ही दुर्देवी आहे, आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेत्यांकडून भडकवणारे स्टेटमेंट देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजले पाहिजे, सर्वांनी शांतता पाळावी, ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना