शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
5
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
6
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
7
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
8
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
11
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
12
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
13
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
14
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
15
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
16
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
17
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
18
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
19
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
20
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

“महागाई-बेरोजगारी-विद्वेषाचा वणवा पेटला, जनता होरपळते अन् राज्यकर्ते थंड आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 7:30 AM

हे चित्र भयंकर आहे. आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Shiv Sena Thackeray Group News: मान्सून रखडला आणि सूर्य कोपला अशा विचित्र कोंडीत सध्या देश सापडला आहे. पुन्हा ज्यांनी यातून जनतेची सुटका करायची ते राज्यकर्ते वेदनांवर फुंकर मारण्याऐवजी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग करीत आहेत. उत्तर प्रदेशात लोक उष्माघाताने प्राण सोडत आहेत. देशात एकीकडे महागाई, बेरोजगारी, विद्वेषाचा वणवा पेटला आहे. दुसरीकडे सूर्य कोपला आहे. जनता त्यात होरपळून निघत आहे आणि राज्यकर्ते थंड आहेत. हे चित्र भयंकर आहे!, या शब्दांत ठाकरे गटाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

पावसाने तर ओढ दिलीच आहे, पण उष्माघाताची भयंकर लाट उत्तरेकडील राज्यांसाठी गंभीर बनली आहे. तीव्र उष्णतेच्या ज्वाळा आणि झळा या राज्यांना सोसाव्या लागत आहेत. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या झळांनी गंभीर रूप धारण केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उष्माघाताची ही स्थिती निश्चितच गंभीर आहे. कारण रुग्णांची संख्या या दोन्ही राज्यांत वाढत आहे. पुन्हा जखमी आणि मृत्यूचा हा आकडा रुग्णालयांमधील आहे. त्यामुळे दाखल न झालेल्या, परंतु मरण पावलेल्या रुग्णांचा विचार केला तर मृत्यूचा आकडा प्रत्यक्षात आणखी जास्त असू शकतो, असा दावा ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते

देशातील उष्म्याची स्थिती कायमच आहे. त्यात आधी ‘एल निनो’चा इशारा आणि नंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा तडाखा यामुळे मान्सूनचा प्रवास रखडला आहे. मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होईल, असे सांगण्यात येत आहे. म्हणजे यंदा जवळजवळ पूर्ण जून महिना ‘पावसाचा अभाव आणि उष्णतेचा प्रभाव’ असा जाणार आहे. त्याचा दुष्परिणाम पीकपेरणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ावर तर होणार आहेच, परंतु मान्सूनचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे देशाचा खरीप हंगामदेखील विस्कळीत होऊ शकतो. धान्य उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते, अशी शक्यता ठाकरे गटाकडून वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, हवामान विभागाने बिहारसाठी ‘अत्यंत उष्ण हवामान’ असा अॅलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत तेथील परिस्थिती आणखी गंभीर होणार हे निश्चित आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही तीव्र उष्म्याचा तडाखा जूनमध्येही जाणवत आहे. किंबहुना मुंबईच्या विक्रमी तापमानाची नोंद जूनमध्ये झाली. रखडलेला मान्सून आणि वाढलेला उष्मा यासाठी ज्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाकडे बोट दाखविले गेले ते आता पाकिस्तानात सरकले आहे. मात्र तरीही त्याचे ‘आफ्टर इफेक्ट्स’ देशाला जाणवत आहेत. महाबळेश्वर, माथेरान आणि इतर थंड हवेच्या ठिकाणी यंदा सूर्य आग ओकताना दिसला, असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना