शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे समंजस, तुरुंगात टाकण्याचं षड्यंत्र भाजप करतं”; ठाकरे गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:39 IST

Maharashtra News: देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्याने पलटवार केला.

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका मोठ्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच यावरून ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे सामंजस्याची भूमिका घेत असतात. तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र भाजप करते, या शब्दांत ठाकरे गटाने पलटवार केला आहे. 

ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. अशा प्रकारे तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र भाजप करते. पण उद्धव ठाकरे अतिशय सामंजस्याने काम करतात. ५० लोक निघून गेले मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी वजन वापरले नाही. ते त्यांचे वजन वापरू शकत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपात तथ्य नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेले विधान योग्य आहे, अशी पुष्टी अंबादास दानवे यांनी जोडली.

तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारणा करण्यात आली. यावर, देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझे आजही त्यांच्याशी कोणतेही वैर नाही. मनात कोणतीही कटुता नाही. पण पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केले. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणे योग्य समजले नाही. उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना