शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Maharashtra Politics: “खोके मिळाल्याने सोडून गेले, प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:12 IST

Maharashtra News: संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा शिंदे गटाकडून केला जातो. याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले.

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर सुनावणी सुरू आहे. पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. खोके मिळाल्याने सोडून गेले, प्रत्येक वेळा भूमिका बदलतात, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. 

संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जातो. यावर संजय राऊत यांनी शिंदे गटावर पलटवार केला आहे. बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारणम्याची भाषा आपण केलीच नव्हती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. हा धमकीचा विषय आत्ता आलाय. ते ज्या माझ्या भाषणाचा उल्लेख करतायत, ते भाषण मी हे लोक सुरतवरून गुवाहाटीला पोहोचल्यानंतर दहिसरला केलेले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे की नेमके ते का सोडून गेले?

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असे भाषण मला वाटते त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी अलिबागच्या सभेत केले होते. त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे की, नेमके ते का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे. ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. तसेच निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय अशी प्रत्येक लढाई ते हरणार आहेत, असा दावाही संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावरुन संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. इतकीच अपेक्षा आहे की दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट विश्वाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला जाऊ नये. या देशात शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर झाला, तर त्याचे स्वागत केले जाईल. दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असे जे राहुल गांधी म्हणतात, फक्त दोघांसाठीच देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते, त्यामुळे हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाईल, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना