शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

Maharashtra Politics: “किरीट सोमय्या ‘स्वच्छता दूत’, राजकारणी कमी अन् RTI कार्यकर्तेच अधिक”; सुषमा अंधारेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 2:42 PM

Maharashtra News: विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरु असलेल्या चौकशांवरुन किरीट सोमय्या आणि भाजप नेतृत्वावर सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली जात आहे. 

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकशांवरून किरीट सोमय्या आणि भाजप नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. देशभरातील बिगर भाजप मुख्यमंत्र्यांनी आणि विविध पक्षांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. पंतप्रधानांना पत्र यासाठी लिहिले की, देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून पंतप्रधानांकडे पाहिले जाते. अपेक्षित असे आहे की, त्यांनीच याचे उत्तर द्यायला हवे. जर ते उत्तर देणार नसतील, तर त्यांच्या सचिवालयातील एखाद्या अधिकाऱ्यांनी पत्राला उत्तर द्यायला हवे. पण याउलट भाजपचे प्रवक्तेच उत्तर देत आहेत, असे सांगत सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.

किरीट सोमय्या ‘स्वच्छता दूत’, राजकारणी कमी अन् RIT कार्यकर्तेच अधिक

स्वच्छता दूत आणि ज्यांच्यामुळे भाजपचे सरकार सत्तेत आले, असे किरीट सोमय्या ते राजकारणी कमी आणि माहिती अधिकार कार्यकर्तेच अधिक आहेत. त्यांनी आरोपी केलेल्या लोकांमध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला होता. त्यांच्यावर १७५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता. सरनाईक यांनी शरणागती पत्करली. आपण असे समजू सोमय्या हे चुकून बोलले असेल. पण माणूस एकदा चुकू शकतो, पण नेहमीच नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. सरनाईक यांच्यावर आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी २२ पत्रकार परिषदा घेतल्या. आनंद अडसुळांसाठी त्यांनी ६ पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळींसाठी त्यांनी ८ पत्रकार परिषदा घेतल्या आणि २२४ ट्विट केले. यशवंत जाधवांसाठी १६ पत्रकार परिषदा घेतल्या, अर्जुन खोतकरांसाठी त्यांनी ९ पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांच्यासाठी २४ ट्विट केले, अशी आकडेवारीच सुषमा अंधारे यांनी दिली. 

दरम्यान, स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर होतोय का? वारंवार भाजपविरहीत लोकांनाच नोटीस येत आहेत. जे दोन टक्के लोक आहेत, जे भाजपमध्ये असून त्यांच्यावर कारवाई झाली, ते भाजपसाठी निरुपयोगी झाले आहेत, असा दावा करत, इतर पक्षातील नेते भाजपमध्ये गेले की, ते व्हाईट होतात. त्यांच्यावरच्या कारवाया थांबतात, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेKirit Somaiyaकिरीट सोमय्या