शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शिवसेनेचे एकला चलो रे...

By admin | Published: March 10, 2016 4:01 AM

जिथे राष्ट्रीय पक्षांना चाळीशीचा आकडा पार करता आला नाही, तिथं आमच्या प्रादेशिक पक्षाने ६३ आमदार निवडून आणले. विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला अजून थोडा वेळ मिळाला असता

पुणे/सातारा : जिथे राष्ट्रीय पक्षांना चाळीशीचा आकडा पार करता आला नाही, तिथं आमच्या प्रादेशिक पक्षाने ६३ आमदार निवडून आणले. विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला अजून थोडा वेळ मिळाला असता तर तुमच्या बरोबरच नाही तर तुमच्याही पुढे गेलो असतो. युती होणार की नाही, यात वेळ वाया गेला. पण हरकत नाही. पुढच्या वेळी विधासभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असे सांगून इथूनपुढे ‘एकला चलो रे’ अशीच शिवसेनेची भूमिका असेल, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे पुणे शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. जलसंपदामंत्री विजय शिवतारे, आमदार डॉ़ नीलम गोऱ्हे, शशीकांत सुतार, संपर्क प्रमुख डॉ़ अमोल कोल्हे, शिवसेना शहर प्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर व्यासपीठावर उपस्थित होते़ ठाकरे म्हणाले, की संसदेत पठाणकोट हल्ल्यावर चर्चा अपेक्षित होती़ ‘‘छाती किती आहे, हे महत्त्वाचे नाही तर ती निधडी हवी़ पठाणकोट हल्ल्यातील शहिदांचे रक्त सुकायच्या आत सरकारला क्रिकेट महत्त्वाचे वाटत आहे़ हिमाचल प्रदेश असमर्थता दाखवत असताना क्रिकेट कंट्रोल बोर्ड आम्ही सुरक्षा पुरवू, असे सांगत आहे़ हा देश केंद्र सरकार चालवतेय की क्रिकेट कंट्रोल बोर्ड?’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली़ धर्माचा द्वेष करायला मला शिकविले नाही़ देश हाच माझा धर्म आहे़ कोणी त्याच्या धर्माचा अभिमान घेऊन उभा राहणार असेल तर हिंदुत्व हा गुन्हा नाही़ मुस्लिम मताचे राजकारण होणार असेल तर मी हिंदुंचे राजकारण का करु नये, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला. स्मार्ट सिटीवर टीका करताना ते म्हणाले, की मुंबई, पुणे हे स्वत:हून स्मार्ट असताना पुन्हा त्यांना पावडर वगैरे लावायची गरज नाही़ पुण्याचे पुणेपण टिकवायचे आहे़ (प्रतिनिधी)