शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

प्रभू रामांनी आराधना केलेले धुपेश्वर येथील शिवलिंग!

By admin | Published: December 30, 2016 6:11 PM

धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा गत दोन वर्षांपासून जीर्णोद्धाराचे कार्य हे एका भोपाळस्थित भाविकाकडून स्वयंस्फूर्तीने केले जात आहे.

ऑनलाइन लोकमतमलकापूर, दि. 30 - संपूर्ण मलकापूर शहराची तृष्णा भागवित असलेल्या पूर्णामायीच्या तिरावर वसलेल्या धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा गत दोन वर्षांपासून जीर्णोद्धाराचे कार्य हे एका भोपाळस्थित भाविकाकडून स्वयंस्फूर्तीने केले जात आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आराधना केल्यामुळे या तीर्थस्थळाला वेगळेच महत्व आहे. मराठवाडा, खान्देश व विदर्भाचा मध्यबिंदू असलेल्या मलकापूर तालुक्यातील मौजे हरसोडा ग्रामपंचायत अंतर्गत धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा परिसर असून या तीनही भागातील अनेक भाविक भक्तांची या तीर्थक्षेत्रावर मोठी श्रद्धा आहे. या भागातील भाविक मोठ्या संख्येत या तीर्थक्षेत्राशी जुळले आहेत. वनवासी जात असताना प्रभू रामचंद्र स्थापित शिवलिंग येथे असून, याकाळी रामाने येथे आराधना केली आहे. घनदाट अरण्याचा हा परिसर असताना येथे श्रीविठ्ठल लहरी पुजारी बाबांनी शिवलिंगाची पुजा व देखभाल मनोभावे केली. या बाबांचे अनेक चमत्कार त्या काळी भाविकांना प्रत्यक्ष अनुभवास आले.बाबांमुळे या तीर्थक्षेत्राची महती वाढली. दरम्यान बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील सदगृहस्थ रावसाहेब बाबुराव पाटील यांनी प्रथम या मंदिराचा सन १९३९ साली जीर्णोद्धार केला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ते सदगृहस्थ काका होते. पुढे सन १९४६ साली मंदिराचे श्रीविठ्ठल लहरी पुजारी बाबांनी मंदिराजवळ जिवंत समाधी घेतली. त्यांच्या पश्चात हभप रामभाऊ पुजारी बाबांनी मंदिराचे सेवाकार्य जोपासले. सन २०१४ मध्ये २९ जुलै रोजी रामभाऊ महाराजांचे दु:खद निधन झाले. त्यानंतर आता मंदिराच्या सेवाकार्याची जबाबदारी श्री पुंजाजी महाराज रायपुरे हे सांभाळीत आहेत.श्रावण महिन्यात दर सोमवारी या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी उसळते. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तांकडून रोडग्यांचा भंडाराही होतो. सद्यस्थितीत संस्थानचे अध्यक्षपद अ‍ॅड. महादेवसिंह रावळ यांचेकडे असून ते नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांचे वडील आहेत. तर व्यवस्थापक म्हणून तेजराव रायपुरे हे जबाबदारी सांभाळीत आहेत. गत दोन वर्षांपासून त्या भोपाळस्थित भाविकांच्या पुढाकारातून व आर्थिक पाठबळातून मंदिराला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरात माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलाणी यांनी त्यांच्या मातोश्री स्मृतिप्रीत्यर्थ भक्तांकरिता थंड व शुद्ध पेयजलाची यंत्रणा उभारून दिली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोषराव रायपुरे यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील यांचे माध्यमातून या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरीता १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी मिळवून या निधीतून ५०-५० लाखांचे दोन भक्तनिवास, २५ लाखांचे स्नानगृह व स्वच्छतागृहे तसेच १६ लाखाची पाण्याची टाकी आदी सुविधांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत १० व १२ लक्ष रुपयांच्या वाहन तळाची निर्मिती करीत संतोषराव रायपुरे यांनी नदीवर घाट निर्मिती, परिसरात विद्युत काम व पेव्हर ब्लॉक अशा विविध दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्तावसुद्धा त्यांनी जि.प. मार्फत केंद्रीय ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचेकडे दाखल केला आहे हे विशेष.