शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वार्थासाठी लोकसभेला पळ काढला; शिवेंद्रसिंहराजेंचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:06 IST

अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मंत्रीपदाच्या लालसेने शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती. त्याला शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रक काढून चोख प्रत्युत्तर दिले.

आपल्याला मंत्रीपदाचा हव्यास असता तर कधीच राष्ट्रवादी पक्ष सोडला असता, असा टोला शिवेंद्रसिंह राजेंनी लावला. मागील १५-२० वर्षे आपण राष्ट्रवादीत काम केले. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपली कधीही आठवण झाली नाही. परंतु, पक्ष सोडला की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्या नावाचा जप सुरू केला आहे. अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला.

यावेळी त्यांनी दिवंगत अभयसिंहराजे आणि शरद पवार यांच्या संबंधावर जयंत पाटील यांनी केलेल्या टिप्पणीचा समाचार घेतला. अभयसिंहराजे-शरद पवार यांचा उल्लेख करणारे जयंत पाटील हे भाऊसाहेब महाराजांना शेवटच्या पंचवार्षिक योजनेत मंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचे राजकारण का झाले, याचं कारण सांगायचा विसरले. १५-२० वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. प्रामाणिकपणाचे मला काय फळ मिळाले. पक्षात असताना माझी कुणालाही आठवण झाली नाही. राष्ट्रवादीत ४० वर्षे राहिलेली कुटुंब पक्ष सोडत आहेत. हे का घडतयं यावर जयंत पाटील यांनी बोलावे असंही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.