शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

"राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 2:59 PM

Sanjay Raut : शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.

पुणे : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढायची तयारी दर्शविली होती. मात्र, कोणत्याच पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत शिवसेनेच्या भूमिकेविषयी नाराजीही व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर राजकारणात चढ-उतार येत असतात, ते पचवता आले पाहिजेत, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना दिला आहे. संजय राऊत हे पुण्यात बोलत होते. 

पुण्यात नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला बुधवारी संजय राऊत यांनी हजेरी लावली. यावेळी राजाला फक्त प्रजा असते, समर्थक नाही. संभाजीराजे, आपण राजकारणात आहात, चढ-उतार येत असतात, ते पचवता आले पाहिजेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ईडीचा वापर होईल, अशी भीती अनेकांना वाटत आहे. कोणी कितीही घोडे उधळू द्या. पण शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.

याचबरोबर, दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केलेल्या कारवाईबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, देशात जे चाललेलं आहे, ते लोकशाहीला पुरक नाही. सत्येंद्र जैन हिमाचलचे प्रभारी म्हणून तयारी करत होते. त्यामुळे भाजपला प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले. जे भाजपच्या विरोधात उभे राहतील त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात. सत्येंद्र जैन यांना अटक झाली, त्यावर केजरीवालही बोलले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा दबावाचे राजकारण सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

सगळ्या संकटात आमची लोकं टिकून राहिली. आपण टिकून राहिलो म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. उडून गेलेल्या कावळ्यांमुळे नव्हे तर तुमच्यासारख्या मावळ्यांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, आम्हालाही हनुमान चालीसा म्हणता येते. पण लोकांचे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत. रस्ते, रोजगार आणि पाणी ही सगळी कामं शिवसेनेचे नगरसेवकच करतात. आम्ही फक्त राजकारण करत नाही. आपण भोंगे लावून सांगत नाही. पण आता आपणही भोंगे लावून आपण पाच वर्षांत काय काम केले, हे सांगायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPuneपुणेShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा