शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

श्रेयाचा ‘श्रीगणेशा’!

By admin | Published: July 09, 2015 2:58 AM

गणेशोत्सव मंडळांवर उच्च न्यायालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे मंडळांच्या उत्साहावर आधीच विरजण पडलेले असताना, आता कुणाच्या नवसाला सरकार पावणार यावरून शिवसेना-भाजपा

मुंबई : गणेशोत्सव मंडळांवर उच्च न्यायालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे मंडळांच्या उत्साहावर आधीच विरजण पडलेले असताना, आता कुणाच्या नवसाला सरकार पावणार यावरून शिवसेना-भाजपा या दोन्ही सत्ताधारी पक्षांत चढाओढ सुरू झाल्याने मंडळांची पुरती दमछाक होत आहे. उच्च न्यायालयाने रस्त्यांवर मंडप घालण्यास बंदी केली असून, ध्वनिप्रदूषण न करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. या आदेशांमुळे बृहन्मुंबई व ठाणे या महानगरांसह राज्यातील इतर शहरांमधील गणेशोत्सव मंडळांसमोर उत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेने या आदेशांबाबत आक्रमक पवित्रा घेत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका घेतली. तर भाजपाने जनाधिकार समितीची बैठक घेऊन सुनील राणे व अमित साटम यांना न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला होता. त्यांचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. विनापरवाना बांधलेले मंडप काढण्याचे आदेश सरकारने महापालिकांना दिले आहेत. या प्रकरणी सरकार आपली बाजू गुरुवारी न्यायालयात मांडणार आहे.-----------------उत्सवावरील विघ्न दूर होईल...गणेशोत्सव व नवरात्रोत्सव यावर गंडांतर आले आहे. त्यामुळे उत्सव साजरा करायचा किंवा कसे, याबाबत मंडळांमध्ये संभ्रम आहे. चर्चा काय झाली ते सांगण्याची ही वेळ नाही. उत्सव साजरा व्हावा याकरिता कायद्यात दुरुस्ती करणार किंवा कसे, हे सांगता येणार नाही. परंतु उत्सवावरील विघ्न दूर होईल, अशी आशा आहे.-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख-------------------मंडळांसाठी हे बंधनकारकच! अन्यथा कारवाई!!मंडप किंवा कोणतेही अन्य बांधकाम यांना परवानगी देताना, परवानगीचा तपशील संबंधित मंडपाच्या दर्शनीभागावर ठळकपणे लावावा. आवश्यक मंजुरी न घेता सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेले तात्पुरते बुथ/मंडप वा अन्य बांधकाम उत्सवापूर्वी, धार्मिक कार्यक्रमांपूर्वी काढून टाकण्यात यावे.मंडप किंवा कोणतेही अन्य बांधकामास परवानगी देताना नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर विपरित परिणाम होणार नाहीयाची दक्षता घ्यावी. उत्सव, कार्यक्रमांपूर्वी किमान ७ दिवसांपूर्वी दर्शनीभागावर लावण्यात येणारा परवानगीचा तपशील तपासणे. परवानगीचा तपशील नसल्यास मंडप काढून टाकण्याबाबत कार्यवाही करणे.पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंमलबजावणी-दरम्यान बाधा आल्यास संबंधित पोलीस स्टेशनकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविणे.-------------------उद्धव ठाकरे हे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार, हे माहीत असल्यानेच शेलार यांनी मंगळवारी रात्री ‘वर्षा’ गाठून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. ------------------------गणेशोत्सवासाठी आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. तर चर्चेचा तपशील कशाला द्यायला हवा, असे उद्धव यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.