शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sindhutai Sapkal: 'नकुशी' ते अनाथांची माय, अनेकांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या माईंचा असा होता खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 09:02 IST

'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 

Sindhutai Sapkal Passed Away: 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सिंधुताई यांचा आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. त्यांच्या आईवडिलांना मुलगी नको होती, म्हणून त्यांनी त्यांचं नाव चिंधी असं ठेवलं होतं. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्ध्यात झाला. गाव लहान असल्यानं सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळं सिंधुताई यांचे फक्त चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचं लग्नही झालं. वयाने २६ वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 

त्यांचा संघर्ष लग्नानंतरही कायम राहीला. नवऱ्यानं घेतलेल्या संशयानंतर त्यांना गावानंही वाळीत टाकलं. आयुष्यातल्याच संघर्षानं सिंधुताई या समाजसेवेकडे वळल्या. अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी १९९४ मध्ये पुरंदर तालुक्यात कुंभारवळण गावात ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. या ठिकाणी सिंधुताईंनी अनाथ मुलांना आसरा दिला. अनेकांना त्यांनी आपल्या पायावर उभं करून आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर योग्य जोडीदार सोधून त्यांनी मुलांची लग्नही लावून दिली. 

सिंधूताई यांनी बाल निकेतन हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह, अभिमान बाल भवन. गोपिका गाईरक्षण केंद्र. ममता बाल सदन, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन न शिक्षण संस्था अशा अनेक संस्था सुरू केल्या. 

गाईच्या गोठ्यात मुलीचा जन्मजन्मापासूनच सिंधुताईंना मोठा संघर्ष करावा लागला. नवऱ्यानं घराबाहेर काढल्यानंतर सिंधुताईंनी गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला. तिची दगडानं तोडलेली नाळ आणि मुलीचा टाहो त्या अखेरपर्यंत विसरल्या नाहीत. लहान बाळ हाती घेऊन त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधीही मिळावा म्हणून 'मदर ग्लोबल फाऊंडेशन'ची स्थापनाही केली. त्यांच्या जीवनावर आधारीत 'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.

अनेक पुरस्कारांच्या मानकरीमहाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

टॅग्स :Sindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे