शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गणेशोत्सवासाठी पीएमपीच्या सहाशे जादा गाडया

By admin | Updated: August 29, 2016 17:26 IST

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठया प्रमाणात येतात.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 29 -  वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठया प्रमाणात येतात. या भाविकांनी रात्री उशीरा पर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर त्यांना परत आपल्या गावी जाता यावे यासाठी पीएमपी प्रशासनाने कंबर कसली असून या वर्षी गणेशोत्सवाच्या शेवटाच्या आठ दिवसात पीएमपीकडून प्रतिदिवशी तब्बल 622 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. नियमित गाडयां व्यक्तीरिक्त या जादा गाडया असणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचा-यांच्या सुटटयाही प्रशसनाने रद्द केलेल्या आहेत. येत्या 8 ते 15 सप्टेंबर दरम्यान, शहरातील प्रमुख 13 डेपोंमधून या जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी शहराच्या उपनगरांमधून तसेच हददी जवळील गावांमधून मोठया प्रमाणात भाविक येतात.रात्री उशीरा पर्यंत देखावे सुरू असल्याने हे भाविकही रात्री थांबतात.मात्र, त्यानंतर त्यांना परत जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्याने त्यांना सकाळ पर्यंत बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे रात्री 10 पासूनच भाविकांना परत जाण्यासाठी या जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. या जादा गाडयांना रात्री 11 वाजे पर्यंत नियमित तिकीट राहणार असून रात्री 11 नंतर तिकिटात 25 टक्के वाढ असणार आहे. तर रात्री 12 नंतर या जादागाडयांसाठी कोणतेही पास चालणार नाहीत. त्यामुळे भाविकांना तिकिट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. 
 
मागणीनुसार गाडया वाढविणार 
पीएमपीकडून सर्व प्रमुख 13 डेपोंमधून या जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीचे नियोजन प्रशासनाने पूर्ण केले असून त्या बाबतच्या सूचना सर्व डेपो प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गाडीला असलेली गर्दी तसेच प्रवाशांकडून केल्या जाणा-या मागणीनुसार, या गाडया सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 20 पेक्षा अधिक प्रवाशांनी मागणी केल्यानंतर गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रामुख्याने पीएमपीच्या हददीबाहेरील मार्गांसाठी ही जादा गाडयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी आवश्यकतेनुसार, चालक आणि वाहकांच्या सुटटयांही रद्द करण़्यात आल्या असून त्यांच्या वेळेचे नियोजन करण़्यात आले आहे.