शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री

By admin | Published: June 28, 2017 2:10 AM

राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी केल्याने तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. पण त्यातूनही मार्ग काढू, सध्या आभाळच फाटलेय, पण खचून न जाता ते शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावांतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन आभार मानले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देण्याची मागणीही केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा आमचा निर्धार आहे. वित्त विभागाने १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करू नका, अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली. समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार आहोत. समस्या संपणार नाही, पण पर्याय शोधत राहू. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.शेतीसाठी सोलार फिडर-शेतीसाठी सोलार फिडर आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल. त्याची सुरु वात राळेगणसिद्धीतून होईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या जे विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी कर्ज काढावे लागणार होते. मात्र आता कल्पक (इनोव्हेटिव्ह ) पद्धतीने पैसे उभारावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.