शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी २५ धरणं रिकामी

By admin | Published: May 15, 2016 7:37 PM

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १५ : पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे. २५ पैकी बहुतांश धरणातील साठा हा वजा झाला असून, यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह, घोड, नाझरे व उजनीचा समावेश आहे.   कुकडी : अनेक वर्षांत प्रथमच नीचांकी साठानारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघे २.०३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक वर्षांमध्ये प्रथमच डिंभे धरणात फक्त ४१ दलघफू तर  माणिकडोह ० टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. जर मॉन्सून सक्रिय न झाल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होणार असून, त्याचा फटका पुणे, नगर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांना बसणार आहे.कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत हे तालुके अवलंबून आहेत. गेल्या महिन्यात पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांकरिता २.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. ते आवर्तन बंद करण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांचे नियोजन राहील. हे पाणी पिण्यासाठी राहील तसेच या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे, असे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी सांगितले. नीरा देवघर, भाटघर धरणे आटलीभोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणात फक्त ४ टक्के, तर भाटघर धरणात ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणातील विद्युतनिर्मितीसाठी व पाईपलाईनची देखभाल व दुरुस्तीसाठी धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.  मागील चार महिन्यांपासून भाटघर धरणातून ७५० क्युसेक्सने, तर सध्या ३३५ क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. धरण ९ टक्क्यांवर आले आहे. पुढील दोन-तीन दिवस पाणी बंद केले जाणार आहे. चासकमान झपाट्याने खाली...चासकमान : धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिरूर व खेड तालुक्यांसाठी १४ दिवसांचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. धरणातील जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.  सध्या धरणात पाणीपातळी ६३२.२३ दलघमी, एकूण साठा ४८.१७ दलघमी, उपयुक्त साठा २०.९८ दलघमी असून, ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालव्याला सोडलेल्या आवर्तनामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी झाला आहे.आसखेड : भामा-आसखेड धरणात २२.१४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या दोन दिवसांत पाच मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडला आहे.                    पाण्याची पातळी ६५६.१० मीटर असून, एकूण साठा ६१.५९७ दलघमी  व  उपयुक्त साठा  ४८.०७५ दलघमी तर वर्षभरात एकूण १००५ मिलिमीटर पाऊस धरण परिसरात झाला.घोड खोरेधरण          पाणीसाठा(%)पिंपळगाव        -७३.८७माणिकडोह        -0.१५येडगाव             १७.९८वडज        ६.५२डिंभे       0.३३घोड       - १0.३२विसापूर        ९.९२भीमाखोरेधरण          पाणीसाठा(%)कळमोडी       २0.७९चासकमान       ९.७८भामा आसखेड      २२.४४वडिवळे       ३५.९७अंद्रा      ५८.७६मुळा-मुठा खोरेधरण          पाणीसाठा(%)पवना        २१.५८कासारसाई      २९.0२मुळशी         १२.२३टेमघर       ४.१८वरसगाव      ५.१२पानशेत      १८.१८खडकवासला    ६४.७४नीरा खोरेधरण          पाणीसाठा(%)गुंजवणी     ८.५८नीरा देवघर     ३.९८भाटघर        ९.२९वीर      ५.७१नाझरे      - १३.९५उजनी    - ४८.0१