शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सायबर हल्ल्याच्या रडारवर स्मार्ट सिटी

By admin | Published: July 01, 2017 7:45 AM

जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. ओनाक्रायच्या व्हायरसपासून वाचण्यासाठीची उपाययोजना सुरू असताना आता पेंट्या व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. भविष्यातही नवी मुंबई, पनवेल परिसरातील माहिती तंत्रज्ञान, अर्थविषयक कंपन्या व मोठ्या उद्योगांसमोर सायबर हल्ल्यापासून बचाव करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनीही या गुन्ह्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले. खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.देशातील प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून नवी मुंबईची जगभर ओळख आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, ओएनजीसी व अनेक महत्त्वाचे उद्योग या परिसरामध्ये आहेत. डीएकेसी, पटनीसह शेकडो आयटी कंपन्याही नवी मुंबईमध्ये आहेत. एकेकाळी केमिकल झोन म्हणून ओळख असणाऱ्या औद्योगिक वसाहतीला आयटी सेक्टरचा दर्जा प्राप्त झाला आहे. रिझर्व्ह बँकेसह सर्वच वित्तीय संस्थांची कार्यालये या परिसरामध्ये आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या पनवेल, नवी मुंबईमधील वाढत्या औद्योगिक साम्राज्यासमोर आता सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. २७ जूनला जेएनपीटीच्या गेटवे टर्मिनल कंपनीवर सायबर हल्ला झाला. जीटीआय कंपनीच्या माध्यमातून रोज ५ ते ६ हजार कंटेनर हाताळले जातात. २००४पासून उत्तमपणे काम करत असलेल्या या कंपनीमधील सर्व २७० संगणक व लॅपटॉपमध्ये पेंट्या व्हायरस शिरला असून सर्व कामकाज ठप्प झाले आहे. हॅकरने कंपनीकडे एक संगणकामधील व्हायरस काढण्यासाठी ३०० डॉलरची खंडणी मागितली असून याविषयी गुन्हा दाखल झाला आहे. देशात यापूर्वी झालेल्या सायबर हल्ल्याच्या वेळी ओनाक्राय या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विंगने या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याविषयीचे माहितीपत्रक तयार केले होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंपन्यांनाही याविषयी माहिती देण्यात आली होती. ओनाक्रायचा धोका संपलेला नसताना आता पेंट्याने धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने राज्याच्या सायबर विंगकडे याविषयी काय खबरदारी घेण्यात यावी? याविषयी विचारणा केली आहे. भविष्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील सर्वच उद्योग समूह, वित्तीय संस्था व आयटीचा वापर असणाऱ्या सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वैयक्तिक व कार्यालयातील संगणक हाताळतानाही योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हॅकर मागतात खंडणीअनोळखी मेल किंवा लिंक उघडल्यामुळे व्हायरस संगणक व लॅपटॉपमध्ये प्रवेश करतो व काही क्षणात कंपनीमधील सर्व संगणक यंत्रणा ठप्प होते. सर्व संगणकीय यंत्रणाच ठप्प होऊन जाते. एखाद्या कंपनीमध्ये सायबर हल्ला केल्यानंतर संगणक व लॅपटॉप सुरू करताना एक मॅसेज दिसू लागतो. तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक केला असून, तुम्हाला तुमचा डाटा हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शनला क्लिक करून ठरावीक रक्कम नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली जाते. जेएनपीटीमधील जीटीआयची संगणकप्रणाली हॅक केल्यानंतर प्रत्येक संगणकामधील व्हायरस दूर करण्यासाठी प्रत्येकी ३०० डॉलरची खंडणी मागण्यात आली आहे.