शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

बचतीसाठी ‘अंघोळीची गोळी’

By admin | Published: April 28, 2016 12:57 AM

राज्यात पाण्याची भीषण टंचाई असताना पुणेकरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे़

पुणे : राज्यात पाण्याची भीषण टंचाई असताना पुणेकरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे़ जर, ४० लाख पुणेकरांनी आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तर तब्बल ४ कोटी लिटर पाणी वाचविता येईल़ या व अशा अनेक पाणीबचतीचे उपाय लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न तरुणांचा एक गट ‘अंघोळीची गोळी’ या उपक्रमातून करीत आहे़ अंघोळीसाठी प्रत्येक जण २० लिटर पाणी वापरतो़ आठवड्यातून एक दिवस अंघोळ न करता केवळ हात, पाय, तोंड धुतले, तर त्यासाठी १० लिटर पाणी लागेल़ प्रत्येक जण १० लिटर पाणी वाचवू शकेल़ अशा प्रकारे ४० लाख पुणेकर किमान ४ कोटी लिटर पाणी वाचवू शकतील़ या शिवाय छोट्या छोट्या उपायातून मोठ्या प्रमाणावर पाणीबचत करता येऊ शकते़ या उपक्रमाचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, की पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे हे सांगत असल्याची बातमी टीव्हीवर पाहत होते. त्या वेळी सहजपणे मीही उद्यापासून एक दिवसाआड अंघोळ करणार, असे म्हटले़ त्यातूनच पाणीबचत कशी करता येईल, याचा विचार करण्यास सुरुवात केली़ काही डॉक्टर मित्रांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, की आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तरी वैद्यकीयदृष्ट्या फरक पडत नाही़ हात, पाय, तोंड स्वच्छ धुतले, तरी चालू शकते़ विद्यापीठात एम़ ए़ (तत्त्वज्ञान)ला माझ्याबरोबर शिकत असलेल्या मित्रांची या उपक्रमाला साथ मिळाली़ सोशल मीडियामार्फत आम्ही हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत़ वाचविलेले हे पाणी आपण येणाऱ्या काळातील पाणीटंचाई कमी करण्यास साहाय्यभूत ठरू शकते़पाणीटंचाईचे गांभीर्य विचारात घेऊन सर्वांनीच पाणीबचतीचा उपक्रम राबविल्यास, तसेच काटकसर केल्यास आणखी काही महिने पाणी पुरवून वापरता येईल.