शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

मग शेतकऱ्यांना इन्क्रिमेंट (हमीभाव) नको का?

By admin | Published: June 03, 2017 3:15 PM

मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या ठराविक मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय एका गटाने जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही.

- बाळकृष्ण परब
शेतकऱ्यांच्या संपामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठराविक मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय एका गटाने जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. एकीकडे आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा मिळतोय, तर कर्जमाफी, हमीभाव यावरून शेतकऱ्यांचे फाजील लाड कशासाठी? असा सवाल विचारणाराही एक वर्ग आहे. पण खरंच शेतकऱ्यांचे लाड होताहेत का? शेती व्यवसाय अडचणीत नाही आहे का? शेतकरी सुखी समाधानी असूनही अवास्तव मागण्या करतोय का? याची उत्तरं नाही अशीच आहेत.
 
९०च्या दशकात आलेली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची लाट, बदलते ऋतुचक्र वाढता उत्पादन खर्च यांचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीस आलाय. उरलीसुरली कसर सरकारच्या धोरणांनी भरून काढलीय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर मार्ग उरलेला नाही. त्यामुळे काही जण आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. तर काही जणांचा संघर्ष सुरू आहे.
 
आम्ही कर भरतो. मग आमच्या करातून शेतकऱ्यांचे चोचले कशाला? असा सवालही काही विरोधक उपस्थित करताहेत. शेतकऱ्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही, हे खरं आहे. पण बी-बियाणी, खते, शेतीला लागणारी साधने यांच्या खरेदीवेळी त्याच्या खिशातून कर वसूल होतोच की. आठवडी बाजारातही स्थानिक प्रशासन कर वसूली करतेच की. बाकी आम्ही कर भळतो म्हणणाऱ्यांपैकी किती जण प्राप्तिकर वाचवण्यासाठी काय काय आकडेमोड करतात, यावर लिहायचे झाल्यास एक स्वतंत्र लेख होईल. असो विषयांतर नको. आपले उत्पन्न कितीही वाढले, इतर गोष्टी कितीही महागल्या तरी अन्नधान्य मात्र अगदी माफक दरात हवे असणारा हा एक वर्ग आपल्याकडे आहे. मग त्याचे उत्पादन करणारा शेतकरी कमी दरामुळे भिकेला लागेना का? आम्ही भरपेट जेवलो म्हणजे झाले! अशीच या वर्गाची अपेक्षा असते!
 
 अन्नधान्याची महागाई वाढली की ओरड करणारा हा वर्ग शेतकऱ्यांचा विचार कधी करतो का? तर अजिबात नाही! शेतीत अन्नधान्य पिकवायला घाम गाळावा लागतो, शेती उत्पादन घ्यायला गुंतवणूक करावी लागते, वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो, हे या मंडळींच्या गावीही नसते.
 
मागच्या 10 वर्षांत शेतीशी संबंधित घटकांच्या किमतीत भरमसाट वाढ झालीय! बैलांची साधारण जोडी खरेदी करायची म्हटले तरी 50 हजार लागतात. खतांच्या, कीटकनाशकांच्या, मजुरीच्या दरात 5 पट वाढ झालीय. त्यात हवामानाची अनिश्चितता आहेच. पिक आलं नाही, नुकसान झालं म्हणून कुणी मदतीला धावत नाही की बँका कर्जात सवलत देत नाहीत. असं असलं तरी शेतमाल माफक किमतीत उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा असते. आता उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळाली तर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार? पण याचं उत्तर शेतकऱ्यांच्या संपाला, मागण्यांना विरोध करणाऱ्यांकडे नाही. सरकारी बाबू, कॉर्पोरेट ऑफिसर, संघटित कामगार अशा सर्वांनाच वर्षाकाठी ठराविक इन्क्रिमेंट मिळत असते. दरवर्षी अशी वाढ होणे आवश्यकच असते, हे तुम्हाला मान्य असेलच. मग वाढत्या महागाईला अनुसरून शेतक-यांनीही शेतमालाच्या दरात वाढ करून मागितली तर त्यात गैर काय? त्यांना हमीभाव, खर्चानुसार उत्पादनाची वाढीव किंमत मिळायला नको का?