शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
2
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
3
कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन
4
कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?
5
IND vs NZ 1st Test : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी पडला भोपळा
6
"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?
7
"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात करा तंत्रज्ञानाचा 'स्मार्ट' वापर!
9
तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा
10
पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर
11
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
12
गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
13
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
14
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
15
३ दिवसांत १३ विमाने उडविण्याच्या धमक्या; केंद्र सरकारकडून उपययोजना सुरू
16
Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश
17
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
18
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
19
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
20
"२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय घेणार"; जरांगे-पाटील आज अर्ज केलेल्या इच्छुकांशी संवाद साधणार

आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 7:48 AM

२०१४ मध्ये जिंकल्या होत्या सर्वाधिक २० जणी...

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून  जाण्यासाठी १९६२ पासून २०१९ पर्यंत १ हजार ६५८ महिलांनी भाग्य आजमावले, पण त्यापैकी केवळ १० टक्के म्हणजे १६१ महिलाच आमदार बनू शकल्या. 

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे, तो आगामी निवडणुकीत अमलात येणार नाही. २०२९ पासून हा निर्णय अमलात येण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर पुरोगामी महाराष्ट्राने आजवर किती महिलांना विधानसभेत पाठविले यावर नजर टाकली तर महिलांना नेतृत्वाची संधी देण्याबाबत महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाही असे  आजवरची  आकडेवारी दर्शविते.   

विधानसभेत महिलांचे प्रमाण निश्चितच वाढायला हवे. माणसाच्या जगण्याचा, त्यांच्या एकूणच विकासाचा विचार ज्या ठिकाणी होतो आणि तसे कायदे केले जातात, अशा सभागृहात संख्येने ५० टक्के असलेल्या महिलांना तेवढे तरी प्रतिनिधित्व मिळायला हवे. केवळ विधानसभाच नव्हे, तर समाजाच्या प्रत्येकच क्षेत्रात महिलांना समान संधी मिळायला हवी.  - डॉ. तारा भवाळकर, आगामी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष.

महिलेला मुख्यमंत्रिपद नाहीच महाराष्ट्रात आजवर महिलेला मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रिपद मिळालेले नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदावरही आजपर्यंत महिलेला संधी मिळालेली नाही. मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्या खा. वर्षा गायकवाड यांनी महिलेला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली होती.

२०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक २४ महिला निवडून गेल्या होत्या. त्यातील वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) खासदार झाल्या.

१९७२ मध्ये ५१ महिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या पण कोणालाही विधानसभा गाठता आली नव्हती. यावेळी मोठे राजकीय पक्ष महिलांना किती संधी देतात याबाबत उत्सुकता आहे. 

महायुती सरकारमध्ये ३९ मंत्र्यांमध्ये केवळ अदिती तटकरे या एकमेव महिला होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर कॅबिनेट तर अदिती तटकरे या राज्यमंत्री होत्या.

टॅग्स :WomenमहिलाElectionनिवडणूक 2024