शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

‘भिरा’ला इतके तापमान का?

By admin | Published: April 12, 2017 4:26 AM

देशभरातील सर्वाधिक तापमान कोकणातील भिरा येथे गेल्या काही दिवसांत किमान दोन ते तीन वेळा नोंदविले गेले़ त्यामुळे सर्वांचेच लक्ष भिराकडे वेधले गेले़ राजस्थानसारख्या

पुणे : देशभरातील सर्वाधिक तापमान कोकणातील भिरा येथे गेल्या काही दिवसांत किमान दोन ते तीन वेळा नोंदविले गेले़ त्यामुळे सर्वांचेच लक्ष भिराकडे वेधले गेले़ राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातून येणारे उष्ण वारे समुद्रसपाटीला असलेल्या भिरासारख्या ठिकाणी पूर्वेकडून खाली येत असल्याने तेथील तापमानात नेहमीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने वाढ होते़ त्यामुळे तेथील तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे़ याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, वाळवंटी प्रदेशातून ४० अंश सेल्सिअस तापमान असलेले गरम वारे महाराष्ट्रात येत आहेत़ भिरा हे समुद्रसपाटीला आहे़ तेथून सह्याद्रीची उंची साधारण ६०० मीटर आहे़ भिरा येथे हे गरम वारे पूर्वेकडून येत आहेत़ वारे जसे उंच जातात, तसे ते थंड होत असतात़ वर जाताना साधारण १ किमीला वाऱ्यांचे तापमान १० अंशाने कमी होते़ याच्या उलट खाली येताना त्यात वाढते़ त्यामुळे भिरा येथील तापमानात साधारण ५ अंश सेल्सिअसने वाढ होते़ तेथे सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमान असताना तेथील प्रत्यक्ष तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाते़ मुंबईत येणारे वारे हे उत्तरेकडून येत असल्याने तसेच तेथे आर्द्रता जास्त असल्याने ते जाणवत नाही़ वाळंवटी प्रदेशाकडून येणारे गरम वारे हे पूर्णपणे कोरडे असतात़ भासमान तापमान आणि हवेतील आर्द्रता यावर प्रत्यक्ष जाणवणारे तापमान किती जाणवते ते अवलंबून असते़ कोरड्या हवामानात ते जास्त जाणवते तर, दमट हवामानात कमी जाणवते, असे डॉ़ कुलकर्णी यांनी सांगितले़