शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

तर तुमची मोबाईल बॅटरी खराब नाही होणार

By admin | Published: March 29, 2017 6:28 PM

हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला वारंवार बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार नाही. अनेकदा असे होते की, आपण फोन चार्जिंगला लावतो आणि झोपून जातो त्यानंतर सकाळी उठल्यावर फोन चार्जिंग बंद करतो. पण असं करण चुकीचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?. आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होते पण बॅटरी खराब होण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे का? नाही ना? चला तर मग आज आम्ही तुम्हाला नेमकं कारण आणि त्यावर उपाय सांगतो.

आपल्यापैकी अनेकजण हे दोन वर्ष फोन वापरतात आणि त्यानंतर बदलतात. सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोबाईल पूर्णपणे चार्ज असावा यासाठी अनेकजण रात्री फोन चार्जिंगसाठी लावतात आणि सकाळी बंद करतात. पण रात्रभर चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते तसेच फोनही हँग होण्यास सुरुवात होते. म्हणूनही हे दोन वर्षापर्यंतच फोन वापरतात आणि त्यानंतर नवा फोन घेतात.

आपण ज्या स्मार्टफोन्सचा वापर करतो त्याची बॅटरी ‘Lithium-Ions’ची बनलेली असते. गरजेपेक्षा जास्त चार्ज असल्यास बॅटरीवर परिणाम होतो. फोनचा चार्जर बनविणारी कंपनी Ankerचे प्रवक्ता Edo Campos यांनी सांगितले आहे की, स्मार्टफोन हे स्मार्ट असतात त्यामुळे त्यांना माहिती असतं की कधी आणि किती चार्ज होण्याची गरज आहे. अँड्रॉइड आणि आयफोन्समध्ये एक खास प्रकारची चिप बसविण्यात आलेली असते. ही चीप फोन चार्ज झाल्यानंतर येणा-या विद्युत प्रवाहाला थांविण्याच काम करते. म्हणजेच जर तुम्ही तुमचा फोन ओरिजनल चार्जरने चार्ज कराल तर तुमची बॅटरी लवकर खराब होणार नाही.