शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

सोलापूर - १६१ वर्षाचा डिकसळचा धोकादायक पूल

By admin | Published: August 06, 2016 3:06 PM

महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे

करमाळा तालुका : २००० साली पुलाचे आयुष्य संपल्याचे ब्रिटिश कंपनीचे पत्र
नासीर कबीर / ऑनलाइन लोकमत -
करमाळा, दि. 6 - महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे. ब्रिटिशांनी सन १८५५ साली भीमा नदीवर बांधलेल्या या पुलाचे वय १६१ वर्षे असून, सन २००० मध्ये ब्रिटिश सरकारने या पुलाचे आयुष्य संपले असून, वाहतुकीस धोकादायक असल्याचे केंद्र व राज्य सरकारला कळवलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आजही या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत आहे तर या परिसरात भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसाही सुरू आहे. 
 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते इंदापूर तालुक्यातील डिकसळच्या सीमेवरून वाहत जाणाºया भीमा नदीवर हा ब्रिटिशकालीन पूल असून, ब्रिटिशांनी १८५५ साली तो बांधला. पुणे जिल्ह्यातील भिगवणला जवळचा व एकमेव मार्ग म्हणून या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती, कोंढारचिंचोली, टाकळी, केत्तूर नं. १ व २, वाश्ािंबे, गोयेगाव, कुंभारगाव, सावडी, दिवेगव्हाण, कात्रज, खातगाव, पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहोरवाडी, भगतवाडी, घरतवाडी, राजुरी, सोगाव, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, उम्रड, मांजरगाव, उंदरगाव आदी ३५ गावांचा पुणे जिल्ह्यातील गावांशी दैनंदिन दळणवळणाचा संपर्क आहे. 
डिकसळच्या पुलाचे बांधकाम होऊन १६१ वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाचे आयुष्यमान केव्हाच संपले आहे. पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे लेखी पत्र ब्रिटिश सरकारने १५ वर्षांपूर्वीच केंद्र व राज्य सरकारला पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाच्या दोन्ही टोकाला भीमा नदीवरील जुना रेल्वे पूल कमकुवत असल्याने जडवाहनासाठी धोकादायक जीप, कार, दुचाकी व जडवाहनासाठी वापर करू नये, असे धोक्याचे फलक लावून ठेवले आहेत. त्याची दखल घेऊन महामंडळाने एस.टी.ची वाहतूक बंद केली. पण सर्रास या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातून बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर, माळेगाव, भवानीनगर आदी साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक होते. 
 
खातगाव, कात्रज या भागातून भीमा नदीतील वाळू उपसा करून या पुलावरून जडवाहतूक सर्रास होते. पाच वर्षांपूर्वी कोंढारचिंचोली ते डिकसळ या रस्त्याच्या कामासाठी पुनर्वसन खात्याने दहा क ोटी रुपयांचा निधी खर्च करून पुलासह रस्ता सुस्थितीत केला. पण सध्या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाचे कठडे तुटले आहेत. या परिस्थितीमध्येसुद्धा या पुलावरून बेमालूमपणे जीवाची पर्वा न करता जडवाहतूक सुरू आहे.