शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कुणी बुडविली काँग्रेस ?

By admin | Published: October 21, 2014 12:59 AM

एकेकाळी नागपुरात काँग्रेसचा दबदबा होता. पक्षाच्या स्टेजवर कार्यकर्ते मावत नव्हते. एखादा मेळावा असला, निवडणूक असली की खांद्यावर काँग्रेसचा झेंडा घेऊन शेकडो कार्यकर्ते बाहेर पडायचे. कारण, आपली

आत्मचिंतन करा : गटबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी अन् फितुरी भोवली कमलेश वानखेडे - नागपूरएकेकाळी नागपुरात काँग्रेसचा दबदबा होता. पक्षाच्या स्टेजवर कार्यकर्ते मावत नव्हते. एखादा मेळावा असला, निवडणूक असली की खांद्यावर काँग्रेसचा झेंडा घेऊन शेकडो कार्यकर्ते बाहेर पडायचे. कारण, आपली अडचण पक्ष सोडवेल याची कार्यकर्त्याला खात्री होती. पण अलीकडे काँग्रेसची संस्कृतीच बदलली. मंत्र्यांनी कधी जनता दरबार घेतले नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. पक्ष संघटना वाढीसाठी पाठबळ दिले नाही. नेत्यांनी कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस केली नाही. नेत्यांनी लाल दिव्यातून फिरायचे अन् कार्यकर्त्यांनी चपलाच झिजवायच्या, असे कुठवर चालणार. कार्यकर्त्याला बळ मिळाले नाही तर तो कुठवर धावणार, याचा नेत्यांनी वेळीच विचार केला नाही. त्यामुळे कार्यकर्ता बसला आणि पर्यायानं पक्षही बसला.विधानसभा निवडणूक काँग्रेस लढली की उमेदवार, पक्ष संघटना लढली की नेत्यांचे कार्यकर्ते? निवडणुकीत पक्ष कुठे दिसला का ? असे एक ना अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्तिगत स्तरावर मते घेतली आहेत. पूर्ण निवडणुकीत पक्ष त्यांच्यासोबत नव्हताच. पक्षाचे संघटन फक्त मंचावर बसण्यापुरते होते. प्रचारात काँग्रेसमध्ये कुठलेही समन्वय दिसले नाही. शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत: पश्चिम नागपुरातून निवडणूक लढत होते. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद हे देखील रिंंगणात होते. नागपुरातील काँग्रेस सहा भागात विभागल्या गेली होती. सर्व मतदारसंघांच्या प्रचाराची धुरा एकहाती ठेवून काँग्रेसचा रथ पुढे दामटताना कुणी दिसले नाही. आजी- माजी खासदारांनी पुढाकार घेऊन एखाद्या अनुभवी नेत्यावर जबाबदारी सोपवून देवडियात निवडणुकीसाठी ‘वॉर रूम’ तयार करायला हवी होती. पण देवडियात सारे काही गार होते. पूर्ण निवडणूक काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नागपुरात फक्त एक दिवस प्रचारासाठी आले. त्यांनी पूर्व नागपूर व पारशिवनी येथे जाहीर सभा घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शहरात दाखल होईपर्यंत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना याची साधी माहितीदेखील नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे निरोप जाहिरात एजन्सीकडून गेले. कुणाचा पायपोस कुणात नव्हता.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची रामटेक येथे सभा असताना नागपुरातून दिल्लीत स्थिरावलेले नेते येथे सक्रिय दिसले. पण राहुल गांधी परतल्यावर या नेत्यांनी पाहिजे तशी निवडणूक अंगावर घेतली नाही. काँग्रेसच्या प्रचारासाठी राज्यस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, महाराष्ट्राचे सहप्रभारी बाला बच्चन, रिता बहुगुणा यांच्यासह राजबब्बर व नगमा आल्या. पण त्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही.