शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:20 AM

महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काही घडेल अशी चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

BJP Reply to Sharad Pawar : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त करत एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटलं. यासोबत शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी राजकारणासाठी हे विधान केल्याचे भाजपनं म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे यासाठी सक्षम असल्याचे म्हटलं. 

नवी मुंबईत डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते, असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

"महाराष्ट्रात हिंसाचार, जातीय दंगली होतील असं भविष्य शरद पवार यांनी वर्तवलं आहे. शरद पवार यांनी ४० वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या तोंडून अशी वक्तव्ये येत आहेत. महाराष्ट्राची जनता कधीही कोणत्याही हिंसाचाराला समर्थन करत नाही. इथली जनता अशी नाही हे शरद पवार यांनाही माहिती आहे. पण राजकारणासाठी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. पण या महाराष्ट्रात हिंसाचाराचा कोणी विचार जरी केला तरी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, राजकारणासाठी महाराष्ट्रात दंगलीच्या गोष्टी करु नका. हे मात्र खरं आहे की, राज्यात काही पक्षाचे लोक समाजात जातीय तेढ निर्माण करुन राजकारण करु पाहत आहेत. लोकसभेतही हेच करण्याचा प्रयत्न केला," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला आहे. मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारManipur Violenceमणिपूर हिंसाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे