शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:23 IST

महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काही घडेल अशी चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

BJP Reply to Sharad Pawar : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त करत एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटलं. यासोबत शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी राजकारणासाठी हे विधान केल्याचे भाजपनं म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे यासाठी सक्षम असल्याचे म्हटलं. 

नवी मुंबईत डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते, असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

"महाराष्ट्रात हिंसाचार, जातीय दंगली होतील असं भविष्य शरद पवार यांनी वर्तवलं आहे. शरद पवार यांनी ४० वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या तोंडून अशी वक्तव्ये येत आहेत. महाराष्ट्राची जनता कधीही कोणत्याही हिंसाचाराला समर्थन करत नाही. इथली जनता अशी नाही हे शरद पवार यांनाही माहिती आहे. पण राजकारणासाठी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. पण या महाराष्ट्रात हिंसाचाराचा कोणी विचार जरी केला तरी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, राजकारणासाठी महाराष्ट्रात दंगलीच्या गोष्टी करु नका. हे मात्र खरं आहे की, राज्यात काही पक्षाचे लोक समाजात जातीय तेढ निर्माण करुन राजकारण करु पाहत आहेत. लोकसभेतही हेच करण्याचा प्रयत्न केला," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला आहे. मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारManipur Violenceमणिपूर हिंसाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे