शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पेरण्या संकटात

By admin | Published: July 10, 2017 4:37 AM

मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत. मराठवाड्यात साधारण ४३ लाख हेक्टर खरीप पीक पेरणी क्षेत्र आहे. त्यातील सुमारे २५ टक्क्यांदरम्यान पेरणी झालेली आहे. विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि.मी. इतकी असून आतापर्यंत १९० मि.मी.च्या आसपास म्हणजे केवळ २३ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीला दमदार सुरुवात करून नंतर वरुणराजाने हात आखडता घेतला. मृगातही बऱ्यापैकी सरी कोसळल्याने फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यात पिके बहरली. परंतु आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, पैठण तालुक्यात पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ७७ टक्के पेरणी झाली; मात्र पिके ऐन वाढीच्या काळात असतानाच १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके माना टाकू लागली आहेत. शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपडत आहेत. पाच-सहा दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. लातूर जिल्ह्यात ८५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र असून, ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे़ त्यामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक ३ लाख हेक्टर पेरा आहे़ नांदेड जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके अडचणीत आहेत. जिल्ह्यातील ७ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी ७ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र खरीपयोग्य शेतजमीन आहे. जिल्ह्यातील ३० मंडळात अत्यल्प पाऊस झाला.जालना जिल्ह्यात पावसाचा तब्बल २० दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली आहे. आता पावसाअभावी वाढ खुंटली आहे. परभणी जिल्ह्यात ३ लाख ३० हजार ६३७ हेक्टर (६३ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून पाऊस लांबल्याने ही सर्व पिके धोक्यात आहेत. हिंगोली जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत, मात्र पाऊस नाही. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु, २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. >२० हेक्टर क्षेत्रावर फिरविला रोटाव्हेटरपावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी २० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरविले. पाऊस नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सुनील कोळी, लोटन पाटील, तुषार पाटील, साहेबराव बडगुजर या शेतकऱ्यांनी सांगितले.दुबार पेरणीनंतरही पाऊस न आल्याने आत्महत्याजळगाव : दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने पीक वाया जाण्याच्या भीतीने नितीन विठ्ठल काटे (३०, रा. सुनसगाव, ता. भुसावळ ) यांनी विषप्राशन करून रविवारी आत्महत्या केली.