शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:34 IST

Akhilesh Yadav: सपा अध्यक्ष अखिलेश यादव उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, मविआच्या नेत्यांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत.

Akhilesh Yadav on Maharashtra Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत समाजवादी पक्षाचे(सपा) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मोठे विधान केले आहे. सपा अध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मी शुक्रवारी महाराष्ट्रात जातोय, तिथे याबाबत चर्चा होईल. 

अखिलेश यादव काय म्हणाले?सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना इंडिया आघाडी मजबुतीने एकत्र काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, 'मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे. इंडिया आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमचे राज्यात दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू.

सपाचा 10-12 जागांवर डोळाअखिलेश यादव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान त्यांचे मालेगाव आणि धुळे येथे कार्यक्रम होतील. दरम्यान, सपा आता यूपीबाहेरही पक्षाचा विस्तार करत आहे. सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा आहे. यामध्ये त्या जागांचा समावेश आहे, जिथे मुस्लिम आणि यूपीमधून येणारे लोक जास्त प्रमाणात राहतात. दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीत सपाला 3-4 जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे.

सपाचे राज्यात दोन आमदारसध्या महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी अबू आझमी हे शिवाजी नगरचे तर रईस शेख हे भिवंडीचे आमदार आहेत. अलीकडेच अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये महाराष्ट्र युनिटच्या नेत्यांची बैठकही घेतली होती. ज्यामध्ये निवडणुकीची रणनीती तयार करण्यात आली आहे. सपा इंडिया आघाडीचा भाग बनल्यास अखिलेश यादव महाराष्ट्रातही प्रचार करताना दिसू शकतात.

अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा

महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पार्टीचा अपमान करू नये. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पार्टीला फक्त एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ 5 मिनिटे चर्चा झाली. समाजवादी पार्टी हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये.  जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर समाजवादी पार्टीला इतर कोणत्याही आघाडीसोबत म्हणजेच तिसरी आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर किंवा महाराष्ट्रात अनेक जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यानंतर जर मुस्लिम मतांची विभागणी झाली तर त्याला समाजवादी पार्टी नव्हे, तर महाविकास आघाडी जबाबदार असेल, असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी