शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

स्पीड लॉक यंत्रणेमुळे मंदावतोय परिवहन बसेसचा वेग

By admin | Published: July 07, 2014 4:05 AM

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महामंडळाने प्रवासी वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. असे असतानाही महामंडळ उद्दिष्टाकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते.

मुंबई : सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महामंडळाने प्रवासी वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. असे असतानाही महामंडळ उद्दिष्टाकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते. एसटी महामंडळाच्या गाड्यांना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ताशी ६०च्या वेगाचा लॉक (स्पीड लॉक) बसवण्यात आला आहे. मात्र यामुळे महामंडळाचीच गोची होत असून, लॉकमुळे गाड्यांचा वेग खूपच मंदावला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७ हजार गाड्या असून, वर्षाला ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे महामंडळाला चांगलेच उत्पन्न मिळते. मात्र महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाले असून, यात वाढ करण्यासाठी एसटीकडून प्रयत्न केले जात आहेत. मुख्य बाब म्हणजे एसटीला स्पीड लॉक बसवल्यानेही त्याचा फटका बसत असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून एसटी गाड्यांना स्पीड लॉक बसवण्यात आल्यामुळे गाड्या धीम्या गतीने धावतात आणि त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर लागत आहे. यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी एसटीकडे येत आहेत. एसटी गाड्यांना ताशी ६०च्या वेगाचा स्पीड लॉकचा नियम आठ वर्षांपूर्वीच करण्यात आला आणि त्याची कठोर अंमलबजावणीही केली गेली. मात्र आगारात रिकाम्या गाड्यांना हा लॉक बसवल्यामुळे प्रवासी भरताच या गाड्या ४० ते ५०च्याच वेगाने धावत आहेत. एक्स्प्रेस मार्गांवर तर वेग पकडताच येत नसल्याने गाड्या उशिराने पोहोचतात आणि प्रवासी, चालकांमध्ये वाद उद्भवत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे उशिराने गाडी स्थानक किंवा आगारात पोहोचल्यास चालकांनाही याबाबत जाब विचारला जातो. त्यामुळे निदान गाड्यांना ८०चा स्पीड लॉक बसवावा, त्यामुळे प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर बसचा वेग हा ६० ते ७०पर्यंत जाईल, अशी मागणी एसटी युनियनकडूनही केली गेली आहे. (प्रतिनिधी)