शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

​एसटी कर्मचा-यांना ४ हजार ८४९ कोटींची वेतनवाढ- दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 21:46 IST

एसटी महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ घोषित केली.

मुंबई : एसटी महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ घोषित केली. कर्मचारी संघटनांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आजवर वेतनकरार लांबणीवर पडत गेले. त्यामुळे महामंडळाच्या अखत्यारित वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा सुमारे १ लाख ५ हजार कर्मचा-यांना फायदा होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.एसटीच्या ७०व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रावते यांनी या वेतनवाढीची घोषणा केली. एसटी महामंडळाच्या आजपर्यंतच्या सर्व वेतनवाढी एकत्रित केल्या तरी इतकी मोठी वेतनवाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाचे सूत्र वापरून ही वेतनवाढ देण्यात आली आहे. शिवाय कनिष्ठ वेतनश्रेणीतील कर्मचा-यांना समकक्ष आणण्याचा यातून प्रयत्न केला गेला आहे. आजपर्यंत केवळ कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यातच वेळ गेला. काही ना काही तरी खुसपट काढून या संघटनांनी वेतनकरार लांबणीवर टाकण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे महामंडळ स्तरावर वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.एकूण ४ हजार ८४९ कोटींच्या या वेतनवाढीमुळे कर्मचा-यांचे वेतन साधारणत: ३२ ते ४८ टक्कयांनी वाढणार आहे. सोबतच कर्मचा-यांच्या विविध भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता १८० रुपयांवरून १ हजार २०० करण्यात आला आहे. धुलाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. सुती गणवेशासाठी ५० वरून १०० रुपये, वूलन गणवेशासाठी १८ वरून १०० रुपये, रात्रपाळी भत्ता ११ वरून ३५ रुपये करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.मान्य नसलेल्यांना ‘सुवर्णसंधी’ योजनानव्या वेतनवाढीच्या संमतीपत्रावर कर्मचा-यांना ७ जूनपर्यंत सह्या कराव्या लागणार आहेत. ज्या कर्मचा-यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांच्यासाठी महामंडळाने सुवर्णसंधी योजना आणली आहे. अशा कर्मचा-यांनी राजीनामा दिल्यास त्यानंतर चालकाकरीता दरमहा २० हजार व वाहकाकरिता दरमहा १९ हजारांवर त्यांना कंत्राटी पद्धतीने पाच वर्षांचा करार करता येईल. या कालावधीत त्यांना दरवर्षी २०० रूये वाढ देण्यात येईल, असे रावते यांनी स्पष्ट केले.एसटीची भाडेवाढ अटळडिझेल दरवाढीमुळे एसटीची भाडेवाढ अटळ असल्याचे रावते यांनी सांगितले. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी दोन हजार कोटींचा बोजा पडत आहे. त्यामुळे ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या अनेक जण गावी गेले आहेत. त्यांना भाडेवाढीचा फटका बसू नये म्हणून १५ जूनपर्यंत भाडेवाढ होणार नाही. डिझेलवरील विविध कर कमी करून महामंडळाला दिलासा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे रावते यांनी सांगितले.​

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळDiwakar Raoteदिवाकर रावते