शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

वाद न घालता जवानांच्या पाठीशी उभे राहा

By admin | Published: October 12, 2016 7:00 AM

पाकिस्तानी कलावंतांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, यावर वाद घालण्याची ही वेळ नसून सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मागे एकजुटीने उभे

मुंबई : पाकिस्तानी कलावंतांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, यावर वाद घालण्याची ही वेळ नसून सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मागे एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले.उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर भारतीय कलाकारांचे दोन गट पडले आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, नाना पाटेकर आदी अभिनेत्यांनी पाकिस्तानी कलाकारांना विरोध; तर ओम पुरी, सलमान खान, करण जोहर, राधिका आपटे आदींनी त्यांची पाठराखण केली आहे. याबाबत अनेक दिवस मौन बाळगून असणाऱ्या सुपरस्टार, ‘बिग बी’ बच्चन यांनी या वादात थेट उडी घेण्याचे टाळले. आपला ७४वा वाढदिवस मंगळवारी कुटुंबीय आणि आप्तेष्टांसोबत साजरा केल्यानंतर ‘बिग बीं’नी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्काराबाबत भूमिका विचारण्यात आली असता अमिताभ यांनी, हात जोडून विनंती करीत असे प्रश्न विचारण्याची ही वेळ नसल्याचे सांगितले. ‘कुणी, कुठे आणि काय म्हणाले, यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. देशावर संकट आहे आणि सीमेवर घडणाऱ्या घटनांमुळे देशातील नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत,’ असे त्यांनी नमूद केले. तसेच आपण सर्वच कलाकारांचा आदर करतो, मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या जिवाचे मोल देणाऱ्या भारतीय जवानांमागे एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उरी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते गाणे गाणार असल्याच्या वृत्ताचा अमिताभ यांनी इन्कार केला. ‘एका खासदाराने मी गायिलेल्या हनुमान चालिसा आणि गणपती आरतीचे कौतुक केले. तसेच मी उरीतील हुतात्म्यांसाठी गावे असे सुचविले. मी तयारी दर्शविली, मात्र अद्याप त्याबाबत काहीही ठोस ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)