शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

By admin | Published: April 08, 2017 5:09 AM

आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता.

मुंबई : आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता. आज कामकाज संस्थगित होताना विरोधी पक्षाने राष्ट्रगीतावरही बहिष्कार घातला. निवडणुकांत सातत्याने झालेल्या पराभवांमुळे विरोधी पक्ष खचून गेला आहे. म्हणूनच त्यांनी ही बहिष्काराची पळवाट शोधून काढली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचा समाचार घेतला. विरोधी पक्षाने खरे तर कामकाजात सहभाग घेऊन चर्चा करायला हवी होती, असेही ते म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी सर्वाधिक भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्याला ८ हजार कोटी रूपयांची थेट मदत करण्यात आली आहे. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला निश्चित दिलासा देण्यात येणार आहे. त्याचसोबत जे १ कोटी शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांनाही मदत करण्यात येईल. राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.विकासनिधीचे समान वाटप झाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. शिवसेनेच्या आमदारांनाही समान निधी वाटप करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण मिळावे, ही आपली भूमिका आहे. त्यासाठीच पत्रकार हल्लाविरोधी विधेयक संमत करण्यात आले आहे. मात्र एका बाजूला प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण देताना कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)>खडसे नाराज नाहीतमाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे स्वपक्षाच्या मंत्र्यांवरच टीका करत असल्याचा प्रश्न केला असता, एकनाथ खडसे हे अजिबात नाराज नाहीत. लोकप्रतिनिधीला जेव्हा जनतेच्या एखाद्या प्रश्नाबाबत सात्विक संताप निर्माण होतो, तेव्हा तो व्यक्त होतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.सेनेचा आरोप हास्यास्पदनिवडणुकांमध्ये भाजपाने ५० हजार कोटी रुपये वापरले, हा शिवसेना खा. संजय राऊत यांचा आरोप हास्यास्पद आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना आपण फार महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.