शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बलात्कार पीडितांच्या अर्थसाह्यात राज्य सरकार वाढ करणार

By admin | Published: April 06, 2017 5:42 AM

बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या अर्थसाह्यात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला

मुंबई : बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या अर्थसाह्यात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला असून, येत्या सहा आठवड्यांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.आॅक्टोबर २०१३मध्ये राज्य सरकारने ‘मनोधैर्य योजना’ अंमलात आणत, अत्याचारग्रस्त महिलांना तीन लाख रुपयांपर्यंत अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला. काही गुन्ह्यांचे गांभीर्य आणि पीडितांची स्थिती पाहून अर्थसाह्य वाढवून द्या, अशी सूचना गेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. सध्याच्या काळात पीडितांना अर्थसाह्य म्हणून देण्यात येणारे तीन लाख रुपये अत्यल्प आहेत. त्यामुळे ही रक्कम दहा लाख रुपये असावी, अशी सूचनाही न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. या सूचनेवर राज्य सरकारने विचार केला असून, तसा प्रस्ताव मांडला आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील अभय पत्की यांनी न्यायालयाला दिली. एका १४ वर्षीय मुलीने तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगत, राज्य सरकारकडे अर्थसाह्याची मागणी केली. मात्र, राज्य सरकारने तिची या संबंधांना संमती असल्याचे म्हणत, तिला सुरुवातीला अर्थसाह्य देण्यास नकार दिला. मात्र, तिने न्यायालयात याचिका दाखल करताच, सरकारने तिला दोन लाख रुपये अर्थसाह्य म्हणून दिले. तर न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला धारेवर धरताना, ही योजना अपमान करणारी असल्याचे म्हटले होते. (प्रतिनिधी)