शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

राज्य सरकारचा ‘नो रिप्लाय’

By admin | Published: July 12, 2017 3:43 AM

केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासंदर्भात ३० जूनपर्यंत कालबद्ध कार्यक्रम सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने ७ जूनला सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले होते.

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासंदर्भात ३० जूनपर्यंत कालबद्ध कार्यक्रम सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने ७ जूनला सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले होते. त्यावरील पुढील सुनावणी ३ जुलैला होणार होती. मात्र, सरकारने कोणतेच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे याचिकेवर सुनवाणीच होऊ शकलेली नाही. दरम्यान, अन्य एका याचिकेप्रकरणीही सरकारने न्यायालयात उत्तर न दिल्याने सुनावणीची तारीख आॅक्टोबरमधील पडली आहे. ही तारीख लवकरची द्यावी, असा मागणी अर्ज १७ जुलैला न्यायालयासमोर याचिकाकर्त्यांच्या वकिलामार्फत केला जाणार आहे. केडीएमसीत १ जून २०१५ ला २७ गावे समाविष्ट झाली. त्यानंतर या गावांसह केडीएमसीची निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता लागू असताना ७ सप्टेंबर २०१५ ला सरकारने गावे वगळण्याची प्राथमिक अधिसूचना काढली. त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी रंगनाथ ठाकूर व इतर ११ जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर ७ जून २०१७ ला सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने सरकारला २७ गावे वगळण्याचा कालबद्ध कार्यक्रम ३० जूनला न्यायालयास सादर करावा. त्यावर ३ जुलैला सुनावणी केली जाईल, असे म्हटले होते. मात्र, सरकारने कालबद्ध कार्यक्रम सादर केलेली नाही. त्यामुळे ही याचिका न्यायालयात सुनावणीसाठी येऊ शकली नाही. संगणकीय प्रक्रियेनुसार या याचिकेच्या सुनावणीची तारीख आॅक्टोबरमध्ये दिली आहे. ही तारीख लांबची असल्याने जवळची तारीख मिळावी, यासाठी १७ जुलैला न्यायालयासमोर विनंती अर्ज करणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील अस्मिता सारंगधर यांनी दिली.२७ गावांप्रकरणी २७ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील व अन्य ५९ जणांनीही एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, सरकारने १४ मे २०१५ ला २७ गावे पालिकेत घेण्याचा अध्यादेश काढला. १ जूनला गावे महापालिकेत समाविष्ट झाली. गावे समाविष्ट करण्यासंदर्भात सरकारने हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याची सुनावणी १२ मे पर्यंत सुरू होती. जवळपास आठशे-हजारपेक्षा जास्त हरकती सूचना होत्या. त्या विचारात न घेता अत्यंत घाईगडबडीत गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. मात्र, त्यावेळी सरकारने कोणतेच कारण दिले नाही. १९९५ मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट केली होती. मात्र, गावांचा विकास होत नसल्याने पुन्हा ही गावे वगळावीत, यासाठी आंदोलने झाली. त्यामुळे सरकारने २००२ मध्ये गावे महापालिकेतून वेगळली. त्यानंतर १ जून २०१५ ला पुन्हा पालिकेत घेतली.सरकारचा वेळकाढूपणा : चंद्रकांत पाटीलरंगनाथ ठाकूर व अन्य ११ जण आणि चंद्रकांत पाटील व अन्य ५९ जणांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिकांसंदर्भात सरकारने कोणतेही उत्तर दिलेले नाही. सरकार वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे, असा आरोप याचिकाकर्ते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील म्हणाले, सरकारने काढलेला अध्यादेशच खोटा आहे. त्यांनी गावे समाविष्ट करताना बाधितांना विचारात घेतलेले नाही. याच मुद्यावर आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. यापूर्वी १५ मार्च २०१७ मध्ये याच याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने दोन आठवड्यांत सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी निवडणुका आणि विधिमंडळाच्या कामकाजाचे कारण सरकारने पुढे केले होते. मार्चपासून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात सरकारकडूनच चालढकल सुरू असल्याची बाब समोर आली आहे. गावे पुन्हा पालिकेत घेताना सरकारने बॉम्बे व्हिलेज अ‍ॅक्टचे पालन केलेले नाही, असा युक्तीवाद याचिकर्त्यांच्या वकील नेहा भिडे यांनी केला होता. त्यावरही सरकारने त्यांचे म्हणणे सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले होते.