शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

वीज खंडित मोहीम बंद करा; आधी बिले दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 8:35 AM

वीज कनेक्शन नाही वा पुरवठा होत नाही तरीही बिलिंग सुरू आहे. वीजबिले व थकबाकी जादा, दीडपट, दुप्पट वा अधिक आहे. अशा शेतीपंप ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची सुरू असलेली मोहीम त्वरित बंद करावी. पिकांचे होत असलेले नुकसान व वाढत चाललेला असंतोष व उद्रेक त्वरित थांबवावा.  बहुतांशी शेतीपंपधारकांची वीजबिले व थकबाकी दुप्पट फुगविलेली, पोकळ व बोगस असल्याने प्रथम वीजबिले दुरुस्त करावीत. त्यानंतरच सवलत योजनेच्या अंतर्गत लाभ देऊन वसुली करावी, अशा मागण्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सरकारकडे केल्या आहेत.

वीज कनेक्शन नाही वा पुरवठा होत नाही तरीही बिलिंग सुरू आहे. वीजबिले व थकबाकी जादा, दीडपट, दुप्पट वा अधिक आहे. अशा शेतीपंप ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. महावितरणने ५० टक्के ग्राहक सवलत योजनेत सहभागी झाले आहेत, अशी प्रसिद्धी सुरू केली. पण महावितरणच्या वेबसाइटवरील माहितीनुसार जमा रक्कम फक्त १० टक्क्यांच्या आत आहे. बिले दुरुस्त केली, तरच शेतीपंप वीजबिल सवलत योजना यशस्वी होऊ शकते. तक्रार करेल त्या प्रत्येकाचे सप्टेंबर २०१५ पासून आजअखेरचे बिल दुरुस्त करावे. दुरुस्त बिलानुसार सवलत द्यावी, अशी कंपनीची १५ जानेवारी २०२१ व १५ फेब्रुवारी २०२१ ची स्पष्ट परिपत्रके आहेत. त्याप्रमाणे उपविभागीय पातळीवर १ लाखपर्यंत व विभागीय पातळीवर ५ लाखांपर्यंत बिल दुरुस्ती करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत; पण व्यवहारामध्ये याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. अनेक हेलपाटे मारूनही व ६/६ महिने वाट पाहूनही बिले दुरुस्त केली जात नाहीत. अल्प वसुलीचे हे खरे, एकमेव व मूळ कारण आहे, हे लक्षात घेऊन योजना आखणे गरजेचे आहे, असेही होगाडे यांनी सांगितले.

बिले दुरुस्ती केल्यामुळे ३० सप्टेंबर २०२० अखेरच्या वसुलीस पात्र रक्कम ३० हजार कोटीवरून खाली येईल. शेतीपंप ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झाला तर वसुलीचे प्रमाण निश्चित वाढेल. वसुलीस पात्र रक्कम २० हजार कोटींवर आली तरीही १० हजार कोटी प्रत्यक्ष जमा होऊ शकतील.

टॅग्स :mahavitaranमहावितरण