शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

वॉटर पार्कचा पाणीपुरवठा बंद करा

By admin | Published: September 06, 2015 1:34 AM

राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने त्वरित बंद करावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर केवळ गरजेपुरता करावा, यासाठी पक्षाच्या वतीने पाणीबचतीबाबत जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम वाया तर गेला आहेच, त्याचबरोबर राज्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट फोफावलेले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यावर खबरदारी म्हणून आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एकही तलाव यंदा भरलेला नाही. त्यातच मान्सूनही १५ दिवस आधीच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याने मुंबईला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. ही बाब लक्षात घेता वर्षभराचा विचार करून वॉटर पार्क, मॉल्सना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, केवळ पिण्यासाठीच पाणी वापरले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास मोठी बचतमुंबईत गाड्या धुण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचप्रमाणे शौचालयातील फ्लशसाठी शेकडो लीटर पाणी लागते. घरात होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास पाण्याची मोठी बचत करता येऊ शकते, याबाबत मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.