शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

शेतकरी आंदोलनाचा झंझावात

By admin | Published: December 13, 2015 1:25 AM

बेळगाव, कोल्हापूर, सांगली या सीमेवरील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात तंबाखू उत्पादन घेतले जात होते. तंबाखूची सर्वांत मोठी बाजारपेठ निपाणी होती. शेकडो खासगी व्यापाऱ्यांच्या हातात तंबाखू

- वसंत भोसलेबेळगाव, कोल्हापूर, सांगली या सीमेवरील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात तंबाखू उत्पादन घेतले जात होते. तंबाखूची सर्वांत मोठी बाजारपेठ निपाणी होती. शेकडो खासगी व्यापाऱ्यांच्या हातात तंबाखू आणि विड्या तयार करणारी प्रचंड गोदामे होती. मात्र, तंबाखूला वर्षानुवर्षे किमान भाव मिळत नव्हता. त्याचा सर्वांत मोठा असंतोष केंद्रात जनता पक्षाची राजवट आल्यावर जाणवू लागला. दहा-बारा रुपये किलोप्रमाणे विकला जाणाऱ्या तंबाखूचा दर रुपया-दीड रुपयापर्यंत खाली आला. निपाणीच्या कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांना पाचारण केले. १९८० च्या डिसेंबरपासूनच गावोगावी प्रभातफेऱ्या, बैठका, जाहीर सभा सुरू झाल्या होत्या. त्याला राजकीय पक्षांची दारे तोडून शेतकरी प्रतिसाद देत होता. कर्नाटकात काँग्रेसचे आर. गुंडुराव यांचे सरकार होते.फेब्रुवारी १९८१ मध्ये शरद जोशी यांनी निपाणीचा प्रथम दौरा केला. १४ मार्च रोजी रास्ता रोकोची घोषणा झाली. हे आंदोलन सलग २३ दिवस चालले. खासगी व्यापारी तंबाखू खरेदी न करण्यावर ठाम होते. अखेरीस कर्नाटक सरकारने आंदोलन मोडून काढण्याचे ठरविले.६ एप्रिल हा आंदोलनाचा २४ वा दिवस होता. गुढीपाडवा सण होता. शेतकऱ्यांचा इतका पाठिंबा असताना सरकार दंडेलशाही करणार नाही, असा विश्वास होता. त्यामुळे शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले की, रात्री घरी जाऊन सकाळी पाडव्याचा सण करून दुपारी परत आंदोलनात उतरा. निवडक कार्यकर्त्यांसह ते स्वत: मात्र रस्त्यावर बसून होते. त्याच रात्री पोलीस कारवाई सुरू झाली. जोशी यांच्यासह प्रमुख नेत्यांना अटक करून गुलबर्गा आणि बेळगावच्या कारागृहात डांबले गेले. ही वार्ता गावोगावच्या शेतकऱ्यांना कळताच, हजारो शेतकरी आंदोलनस्थळाकडे धाव घेऊ लागले. त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार सुरू झाला. शरद जोशी यांना अटक झाल्याचे समजताच जमाव संतप्त होत होता. कर्नाटक पोलिसांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्यात १३ शेतकरी ठार झाले आणि गुढीपाडव्याच्या सण हा (६ एप्रिल) काळा दिवस ठरला. (लेखक ‘लोकमत’च्या कोल्हापूरचे आवृत्तीचे संपादक आहेत)