शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

बीपीटीतील पथदिवे वर्षभर बंद

By admin | Published: April 28, 2016 2:50 AM

वडाळ््याच्या बीपीटी वसाहतीतील पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : वडाळ््याच्या बीपीटी वसाहतीतील पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील बीपीटी अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. वडाळा पूर्व भागात बीपीटी कामगारांच्या वसाहती आहेत. तिथे पाच हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कुटुंबे राहतात. मात्र येथील रेनॉल्ड्स कॉलनी, तेजस नगर, सद्भावना नगर, ओल्ड कॉलनी, न्यू कॉलनी या भागांत गेल्या वर्षभरापासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी सहानंतर अंधाराचे साम्राज्य पसरते. अंधाराचा फायदा गर्दुल्ले आणि चोरटे घेतात. परिसरात छेडछाडीचे प्रमाणही वाढले आहे. तसेच गेल्या काही वर्षांत घरफोडीचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडाळा फलाट क्रमांक चारच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीआड अनैतिक आणि अश्लील प्रकार सर्रास होत आहेत. रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलीस देखील मूक गिळून बसले आहेत. परिसरात पथदिव्यांची सोय करावी, अशी मागणी अनेकदा रहिवाशांनी बीपीटी अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र त्यांच्याकडून या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचीही मागणी बीपीटीतील रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)