शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

“आता निवडणुका झाल्यास भाजप तोंडावर आपटेल, जागे व्हा अन्यथा...”; पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 17:38 IST

राज्यात आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी भाजप-शिंदे गटाला चितपट करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: राज्यात अनेकविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकाबाजूला लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून, दुसरीकडे लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता निवडणुका झाल्यास भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असा घरचा आहेर देत पक्षातील ज्येष्ठ नेत्याने आता तरी जागे व्हा, असा सल्ला दिला आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत महाराष्ट्र भाजपला जागे होण्याचे आवाहन केले आहे. आज निवडणुका झाल्या तर भाजप तोंडघशी पडणार हे निश्चित. महाविकास आघाडी त्यांना अगदी आरामात चितपट करण्याच्या स्थितीत आहे. भाजप नेतृत्वाने झोपेतून जागे व्हावे, असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. 

एनडीएची मतदानाची टक्केवारी केवळ ३९.३ टक्के

आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तर एनडीएची मतदानाची टक्केवारी केवळ ३९.३ टक्के राहणार आहे. भाजपला ३३.८ टक्के तर शिवसेना शिंदे गटाला केवळ ४.४ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी झपाट्याने आपला जनाधार वाढवत आहे. स्वामींच्या म्हणण्यानुसार, आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला ४७.७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १९.९ टक्के मते मिळू शकतील, तर राष्ट्रवादीला १५.३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला १२.५ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले जात आहे. आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला भाजपपेक्षा ८.४ टक्के जास्त मते मिळण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपने तातडीने सावध व्हायला हवे, असे स्वामी म्हणतात. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. तिथे भाजपचा एवढा पराभव झाला तर ते भविष्यासाठी चांगले नाही. भाजप नेतृत्वाने झोपेतून जागे होऊन पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असा सल्ला स्वामींनी दिला आहे. 

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी