शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात

By admin | Published: July 13, 2017 2:11 AM

‘चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर माझ्याविषयी कोण काय बोलतं यावर मी विचार करत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर माझ्याविषयी कोण काय बोलतं यावर मी विचार करत नाही. क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात. अशा चुका मुद्दामहून होत नाही,’ अशा शब्दांत भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याने भारत - पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्याविषयी आपली प्रतिक्रीया दिली. इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात जडेजा व हार्दिक पांड्या यांच्यात झालेल्या गोंधळामुळे पांड्या धावबाद झाला होता. यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियाद्वारे जडेजावर टीका केली होती. याविषयी विचारले असता जडेजा म्हणाला की, ‘जे कट्टर क्रिकेटप्रेमी आहेत, त्यांना माहित आहे की क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात. असे धावबाद कोणताही खेळाडू मुद्दामहून करत नाही. ती एक नकळतपणे झालेली चुक होती आणि खेळामध्ये असे होत असते.’वेस्ट इंडिज दौऱ्याहून जडेजा थेट मुंबईत बुधवारी एका कार्यक्रमासाठी उपस्थित झाला होता. यावेळी त्याने म्हटले की, ‘आयपीएल युवा खेळाडूंसाठी खूप चांगली संधी असते. मी आयपीएलद्वारेच राजस्थान रॉयल्स संघातून स्वत:ला सिध्द केले. माझ्यासाठी ती मोठी संधी होती. निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न होता. प्रत्येक युवा खेळाडूने आयपीएलद्वारे मिळालेली संधी साधली, तर तो उच्च क्रिकेट खेळू शकतो.’विदेशामध्ये आश्विन - जडेजा अपयशी ठरतात अशी नेहमी टीका होते, याबाबत विचारले असता जडेजा म्हणाला, ‘टिकाकारांचे काम असते टीका करणे. मी त्यांच्यासाठी नाही, तर माझ्यासाठी खेळतो. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.’ तसेच, ‘मी माझ्या खेळामध्ये काही खास बदल केले नव्हते. माझे सर्व लक्ष खेळावर केंद्रीत होते. महत्त्वाचे म्हणजे मी अधिक मेहनत घेण्यावर भर दिला आणि त्याचा मोठा फायदा झाला,’ असेही जडेजाने म्हटले.>आज लोकांकडे वेळेची कमतरता आहे. टी२० सामना साडेतीन तासांत संंपतो. एकेरी दुहेरीपेक्षा क्रिकेटप्रेमींना चौकार षटकार आवडतात. त्यामुळे टी२० लोकप्रिय आहे. पण यामुळे कसोटी क्रिकेट अजिबात संपणार नाही. जागतिक स्तरावर कसोटी क्रिकेटला मोठा मान आहे. इंग्लंडसारख्या देशात आजही मोठ्या संख्येने कसोटी क्रिकेट बघायला क्रिकेटप्रेमी येतात. टी२० आणि कसोटी क्रिकेट पूर्णपणे वेगळे असून, ते आपआपल्या जागी आहेत. - रवींद्र जडेजा