शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
3
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
4
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
5
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
6
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
7
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
8
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
9
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
10
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
11
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
12
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
13
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली हातात २.३० कोटींची नकली नाणी
14
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
15
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
17
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
18
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
19
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
20
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी

सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न?; अंजली दमानियांचा पुन्हा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:43 IST

अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आरोपींच्या जबाबातून स्पष्ट होत नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिवसागणिक नवे तपशील समोर येत आहेत. पवनचक्की कंपनीच्या बाहेर करण्यात आलेल्या मारहाणीमुळे आम्ही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले या आरोपीने दिल्यानंतर आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. "सुदर्शन घुले याचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न? एका स्टँडर्ड फॉर्मेटसारखा तीनही आरोपींचा जबाब आहे," असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

आरोपींच्या जबाबावरून तपास यंत्रणांवर प्रश्नांची सरबत्ती करताना अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, "खुनानंतर आरोपींनी पळून जायचं कसं ठरवलं? कोणी मदत केली, कुठे गेले, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्याबरोबर होता, कुणाच्या सांगण्यावरून ते पळाले, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का? ते कुठे-कुठे पळाले, भिवंडीला किती दिवस होते, कोणी पैसे पोहोचवले, मग ते पुण्यात कसे आले, कोणी यायला सांगितलं? कृष्णासोबत त्यांनी काय केलं? सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा व कधी झाला ? डॉ. वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले? हे काहीच आरोपींच्या जबाबात आलेलं नाही," असं दमानिया यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचा उलगडा तपास यंत्रणांकडून आगामी काळात केला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

जयराम चाटेने जबाबात काय म्हटलंय?

मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीच्या गोदामाच्या परिसरात ६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले व इतरांना सरपंच संतोष देशमुख व त्यांच्या गावच्या काही नागरिकांनी केलेली मारहाण ही सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच करण्यात आली, असा जयराम चाटे याने पोलिसांना जबाब दिल्याची माहिती समाज माध्यमांवर शुक्रवारी प्रसारित होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. जयराम चाटे याने आपल्या जबाबात ९ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास सुदर्शन घुले, मावसभाऊ कृष्णा आंधळे, प्रतीक घुले सोबत असताना सुदर्शन घुले व इतरांना अवादा कंपनीच्या गोदामाच्या परिसरात झालेल्या मारहाणीमुळे वाल्मीक कराडची बीड जिल्ह्यात इमेज डाऊन झाली आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख याला ताब्यात घेऊन त्याला चांगलीच अद्दल घडवायची आहे, अशी बैठक वाल्मीक कराडच्या परळी येथील जगमित्र कार्यालयात झाल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारी