शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“युती तुटायला उद्धव ठाकरेच जबाबदार, त्यांच्या डोक्यात केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:45 IST

Sudhir Mungantiwar: बाळासाहेबांनी हेच शिकवले होते का तुम्हाला, असा सवाल करत सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Sudhir Mungantiwar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला. यातच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरेंच जबाबदार असल्याची टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाबाबत सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, काय चूक आहे. युती आम्ही कधीच तोडली नाही. जेव्हा आमच्यासमोर आमचा मित्र अहंकार व्याप्त होतो, कपोलकल्पित कथा करून खुर्चीचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करतो, हृदयात सत्तांध भाव, डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, यातून राजकीय विश्वासघाताला जन्म दिला जातो. विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत, महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करतील, असे अनेकदा सांगितले गेले. तेव्हा जगातील सर्व फेव्हिकॉल ओठाला लावून शांत बसायचे आणि २०१९ मध्ये निवडणुकांचे निकाल यायला सुरुवात झाल्यावर हे निकाल विश्वासघातासाठी पोषक आहेत, हे लक्षात आल्यावर काही कथा करायच्या, अशी टीका करताना हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हेच शिकवले होते का तुम्हाला, असा थेट सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 

तुम्हाला आमच्यासोबत यायचे नव्हते, तर येऊ नका

तुम्हाला आमच्यासोबत यायचे नव्हते, तर येऊ नका. मात्र, खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तुम्ही का गेलात आणि आता अजित पवार आम्हाला पाठिंबा द्यायला निघाले, तेव्हा सामनामधून तुम्ही टीका केली. या लेखणीचा जगात सर्वांत जास्त दुरुपयोग सामनामधून करण्यात आला. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या लेखणीचा उपयोग कधी झाला नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी देशवासीयांच्या हृदयात पोहोचत असल्यामुळे विरोधकांना आणि घराणेशाहीवाल्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे. यांच्या दुःखावर २०२४ मध्ये जनता पराभवाची फुंकर घालण्याचे काम करेल, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. 

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे