शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
6
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
7
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
8
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
9
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
10
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
11
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
12
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
13
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
14
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
15
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
16
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
17
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
18
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
19
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 3:46 PM

Chandrapur Loksabha Constituency : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील एक्झिट पोल समोर येताच भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केलं आहे.

Sudhir Mungantiwar : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. विविध एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार अनेक तगड्या उमेदवारांचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या निकालामुळे आता भाजपचं टेंशन वाढलं आहे. तर दुसरीकडे, पराभवानंतर खचनार नाही, असं विधान मुनगंटीवार यांनी केलंय. त्यामुळे आता मुनगंटीवार यांची निराशेची भाषा कशासाठी अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर देशभरात एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजपचे ४५ पेक्षा अधिक जागा मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे दिसतंय. तसेच भाजपच्या बड्या उमेदवारांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारण्याची शक्यता आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवण्यासाठी मी तयार नव्हतो, असं विधान केलं आहे.

पराभव अटल बिहारी, इंदिरा गांधी यांचाही झाला होता अशी सूचक प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपा माझासोबत बोलताना दिली. "चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो. पण पक्षाचा आदेश आला आणि ही जागा लढवली. आनंदाची गोष्ट आहे की एक्झिट पोलच्या सर्व्हेमधून जनतेच्या मनातील भावना व्यक्त झाली. मला वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासावर मतं मागितली. हा देश म्हणजे माझा परिवार आहे, या भावनेने त्यांनी काम केलं. या देशातील जनतेनं ४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने कौल उभा केला तर देशाचा जास्त फायदा आहे," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

"अमित शाह यांनी म्हटलं होतं की, आम्ही कितीतरी पराभव सहन केले आहेत. मला वाटतं आमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. शेवटी पक्षाचा विजय आणि पराभव यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून राहत नाही. तर संघटना, विचार, पक्षाचं संघटन यावरही अवलंबून असतं. त्यामुळे एखादा पराभव होतो. देशात अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोर जावं लागलं होतं. मात्र, पराभवानंतरही त्यांनी नैतिकतेमध्ये कणभरही फरक पडू दिला नाही. पण राहुल गांधींना पराभव झाला की जाती दिसतात," असेही मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandrapur-pcचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी