शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

साखर सांडली की मुंग्या येणारच

By admin | Published: January 04, 2017 1:42 AM

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत

मुंबई : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत काही बोलल्यास आम्हाला लगेच जुन्या विचारांचे ठरवले जाते. पण पेट्रोलजवळ आग नेली तर आग भडकणारच, साखर सांडली तर मुंग्या जमा होणारच. स्त्री आणि पुरुषांमध्ये एक योग्य अंतर असावे, आजकाल महिला जितक्या तोकड्या कपड्यात वावरतील तितके त्यांना फॅशनेबल आणि आधुनिक समजले जाते. अशा तोकड्या पेहरावांमुळे विनयभंगासारखे प्रकार घडतात, असे विधान आझमी यांनी केले.कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीदरम्यान पोलिसांदेखत अनेक महिलांची छेडछाड काढण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सदर घटनेसाठी पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनाच जबाबदार धरले. पोलिसांची संख्या मर्यादित आहे. पार्टीसाठी आलेल्यांचे पाश्चात्त्य कपडे आणि वागणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढवून घेतला होता. परमेश्वरन यांच्या विधानाचीच अबू आझमी यांनी री ओढली आहे. बंगळुरू येथील घटनेसाठी महिलांनाच जबाबदार धरत भारतीय संस्कृतीपासून दूर गेल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात, असे विधान आझमी यांनी केले. बंगळुरू येथील घटना दुर्दैवी असून, संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मात्र हल्लीच्या जमान्यात महिला जितके तोकडे कपडे घालेल, जितके अंगप्रदर्शन करेल, तितकेच तिला आधुनिक, फॅशनेबल आणि सुशिक्षित मानले जाते. हे फॅड वाढले आहे. माझी बहीण किंवा मुलगी सूर्यास्तानंतर परपुरुषासोबत थर्टी फर्स्ट साजरा करीत असेल आणि तिच्यासोबत तिचा नवरा किंवा भाऊ नसेल तर हे योग्य नाही,’ असेही आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमी यांच्या या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना समन्स बजावले आहे. आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)आझमींचे वक्तव्य चिथावणीखोर - गोऱ्हे नववर्षाचे स्वागत करणाऱ्या महिलांशी काही समाजकंटक श्वापदाप्रमाणे वागतात. आयटी क्षेत्रातील महानगरांमध्ये अशा घटना घडणे देशाच्या विकासासाठी मारक आहे. त्यातच अबू आझमींसारखी मंडळी महिलांच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करून महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणतात. महिलांवर बंधने आणि पुरुषांना मोकळे रान देणारी चिथावणीखोर वक्तव्ये थांबायला हवीत, असे मत शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.