शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By admin | Published: July 18, 2016 11:48 PM

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; बाभळीच्या झाडाला लटकून घेतला गळफास.

चिखली (जि. बुलडाणा): दुष्काळी स्थिती आणि सततची नापिकी यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा चढला असताना कुटुंब चालवायचे कसे, या विवंचनेत चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी येथील तरुण शेतकर्‍याने आपल्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.तालुक्यातील भोरसा-भोरसी येथील दत्तात्रय पुंडलिक अकाळ (३५) यांच्याकडे चार एकर शेती आहे. यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला जात होता. त्यांच्यावर स्टेट बँकेचे ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान, गत तीन वर्षांंंपासून सतत दुष्काळ व नापिकीमुळे त्यांना घरखर्चही भागविणे कठीण झाले होते. अशात बँकेचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत दत्तात्रय अकाळ यांनी सोमवार १८ जुलै रोजी त्यांनी त्यांच्या शेतातील गोठय़ानजीक असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक शेतकरी दत्तात्रय अकाळ यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे