शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

मुलगा आणि भावाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 5:25 AM

कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेऊन जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाच्या युवा मोर्चाचे पालघर-ठाणे जिल्हा सरचिटणीस अरुण सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे. याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सिंग यांनी केली आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागवून एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांनी गु्न्हा दाखल करून महिला पत्रकार ज्योती तिवारी, तिचे वडिल लक्ष्मीकांत तिवारी, रोहित कोनारी यांना ७ जून २०१७ ला अटक केली आहे. त्यानंतर याप्रकरणात आपला कोणताही सहभाग नसताना विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक डोईफोडे, हवालदार गांगुर्डे यांच्यासह सात-आठ पोलीस साध्या वेषात १५ जूनच्या पहाटे दोन वाजता दरवाजा तोडून आपल्या घरात घुसले. घरात असलेल्या सीसीटीव्ही डिव्हीडी तोडून टाकला. त्यानंतर मुलगा अनुज सिंग (१८) आणि भाऊ अजित सिंग (३२) यांना बेकायदेशीरपणे विरार पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये टाकले. त्याठिकाणी दोघांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कळल्यानंतर पोलीस तिवारीप्रकरणात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती असल्याने आपण वसई कोर्टातून १५ जूनला अटकपूर्व जामीन घेतला. ही माहिती मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी मुलगा आणि भावाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडून दिले. असा आरोप अरुण सिंग यांनी केला आहे. पोलिसांवर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तक्रार आली असेल तर त्याची शहानिशा केली जाईल, असे डिवायएसपी जयंत बजबळे यांनी सांगितले.