शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या; उस्मानाबादेतील ह्दयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 2:08 PM

शहरात चहाची टपरी चालवत दत्तात्रय वऱ्हाडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. निवडणुका आल्या की चहाची टपरी बंद करत शिवसेनेच्या प्रचारासाठी गावोगावी पायपीट करायचे.

उस्मानाबाद – १९६६ साली शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या वाणीनं राज्यभरात अनेक निष्ठावंत शिवसैनिक तयार केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या एकवचनी कारभारामुळे लाखो शिवसैनिक बाळासाहेबांसाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार असायचे. बाळासाहेबांनीही कधी शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडलं नाही. शिवसैनिकांमुळेच मी शिवसेनाप्रमुख आहे हे वाक्य बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांचं प्रेमाचं नातं होतं. शिवसैनिक बाळासाहेबांना दैवत मानतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

उस्मानाबाद येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकांने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून दत्तात्रय वऱ्हाडे नावाच्या शिवसैनिकाने आत्महत्या केली आहे. वऱ्हाडे हे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. १९८४ मध्ये बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन वयाच्या २२ व्या वर्षी दत्तात्रय वऱ्हाडे यांनी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती.

कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारासाठी सज्ज असलेले दत्तात्रय वऱ्हाडे घरोघरी जात धनुष्यबाणावरच शिक्का मारा अशी विनवणी लोकांना करायचे. बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत वऱ्हाडे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह उस्मानाबादेत शिवसेनेचा पहिला झेंडा रोवला. त्याकाळी कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना उधारीचे पैसे घेऊन वऱ्हाडे यांनी शाखा स्थापन केली.

शहरात चहाची टपरी चालवत दत्तात्रय वऱ्हाडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. निवडणुका आल्या की चहाची टपरी बंद करत शिवसेनेच्या प्रचारासाठी गावोगावी पायपीट करायचे. वऱ्हाडे यांना ४ मुली आणि २ मुले असून आर्थिक बाजू कमकुवत असल्याने मुलांचे शिक्षण अर्धवट राहिलं. चहाच्या टपरीवर मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मुलींची लग्न केली. घरची बिकट परिस्थिती असतानाही शिवसेनेवरील त्यांची निष्ठा कधी कमी झाली नाही. शिवसेनेच्या प्रचारासाठी कायम ते हजर होते असं त्यांच्या मुलांनी सांगितले. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसैनिक हे नातं किती घट्ट होते ते जाणून येते. मात्र याच शिवसैनिकाने अखेर आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.

उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू

अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाल्याची घटना घडली होती. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे निधन झाले होते.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे