शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

रविवार ठरला घातवार

By admin | Published: May 16, 2016 4:57 AM

रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले.

मुंबई : रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले. तेलंगणच्या आदिलाबाद जिल्ह्यात अ‍ॅपे आॅटोला खडीने भरलेल्या टिप्परने दिलेल्या धडकेत नांदेडच्या १३ मजुरांसह १५ भाविक ठार व ३ जण गंभीर जखमी झाले़ तर, मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे शिवनेरी बस आणि मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार तर चार जखमी झाले.नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील १८ मजूर आदिलाबादच्या निर्मलजवळील आडेली देवीच्या दर्शनाला आॅटोने जात असताना मध्यरात्री दहेगाव शिवारात समोरून येणाऱ्या टिप्परने (पान १० वर)(पान १ वरून) जोरदार धडक दिली़ त्यानंतर खडीने भरलेला हा टिप्पर उलटल्याने आॅटोचा चक्काचूरझाला. क्रेनच्या सहाय्यानेटिप्परला बाजूला करून मृतांना बाहेर काढले़यात गणपत आडेलू बाजेकर (५०), रतनबाई गणपत बाजेकर (४५), नरसिंग गणपत बाजेकर (३२), वंदना नरसिंग बाजेकर (३०), महानंदा दिलीप बाजेकर (२८), दीपा दिलीप बाजेकर (७), साई दिलीप बाजेकर (४),राजेश नरसिंग बाजेकर (२), शोभा राहुल बाजेकर (१९), प्रेम प्रल्हाद भालेराव (३), अर्चना सुरेश भालेराव (१०) ( सर्व जि़ नांदेड), प्रियंका गंगाधर दिवटेकर (१३) व आॅटोचालक बालू पोशट्टी संपागी (दोघेही तेलंगण), सुशीलाबाई बाबुराव गायकवाड (४५) व अर्जुन बाबुराव गायकवाड (११, दोघेही रा़ रामखडक, ता़उमरी, जि़नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर, राहुल गणपत बाजेकर (२२), दिलीप गणपत बाजेकर (३२), गंगाधर चन्ना ब्रम्हैया (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत़ लक्झरी-कंटेनर अपघातात चार ठारराहाता (अहमदनगर) : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली़रविवारी पहाटे पाचच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनर हे एकामागून एक शिर्डीकडून नगरच्या दिशेने जात होते़ या कंटेनरमध्ये पवनचक्कीचे पाते होते़ कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी आराम बस कंटेनरला धडकली़ पवन चक्कीचे पाते बसमध्ये घुसले़ यात बसचालक जितेंद्र रामरतन मुक्ती (४३), रचना जैन (४२), अर्चना शहा (४५, सर्व मध्य प्रदेश) व वाहक राकेश (पूर्ण नाव माहित नाही) यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>शिवनेरी-कारचा अपघातमहाड : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे माणगाव तालुक्यातील रुद्रोली गावाजवळ पणजी-मुंबई शिवनेरी बस आणि एका मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांवर काळाने झडप घातली. डोंबिवली येथील तांबे कुटुंबीय हे मंडणगड तालुक्यातील पेवे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात मोटारीतील संतोष तांबे (४३), स्वाती तांबे (३५), वृषभ तांबे (६), भिकूराम तांबे (७२) व प्रवीण पांडव (२९) मोटारचालक हे जागीच ठार झाले तर सूर्यकांत तांबे (४७), स्वप्निल तांबे (३५) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.