शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर सुप्रिम कोर्टाचे कडक ताशेरे, नोंदवलं ठाकरे सरकारवरच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 7:23 PM

12 MLA Suspension : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळाप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केले होते.

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळाप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केले होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही ही कारवाई मागे घेण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकरणी भाजपाच्या १२ निलंबित आमदारांनी सुप्रिम कोर्टातही धाव घेतली होती. त्यामुळे या विषयावरून न्यायालयीन लढाईही सुरू झाली होती. दरम्यान, या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावरून राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहे.

१२ आमदारांच्या निलंबनप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात दिवसभर झालेल्या युक्तिवादात सुप्रीम कोर्टाने या कारवाईवर कडक ताशेरे ओढले आहेत. आमदारांचं निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय असला तरी ६० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी ते करता येणार नाही, असं कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हटलं आहे.

१२ आमदारांवर झालेली निलंबनाची कारवाई ही बरखास्तीपेक्षाही जास्त कडक ठरत असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईत कोर्ट सहसा ढवळाढवळ करत नाही. हा सभागृहाचा अधिकार असतो, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्यावतीने कोर्टात करण्यात आला. मात्र या कारवाईत केवळ आमदारांनाच नव्हे तर घटनात्मक मूल्यांनाही शिक्षा होत असल्याचे मत सुप्रीम कोर्टानं नोंदवत कडक टिप्पणी केली. आता भाजपच्या बारा निलंबित आमदारांच्या याचिकेवर पुढील सुनावणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत गोंधळ झाला होता. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनाता तालिका सभापती भास्कर जाधव यांच्यासोबत भाजपाच्या आमदारांचा वाद झाला होता. त्यानंतर तालिका सभापती  असलेल्या भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन केलं होतं. त्या आमदारांमध्ये आशिष शेलार,  अतुल भातखळकर, गिरीश महाजन, संजय कुटे, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, बंटी भांगडिया, हरिश पिंगळी यांचा समावेश होता. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाMLAआमदारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय